भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 505, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 505

सार्थ तुकारामगाथा ४६३ विवरण - भक्तिभावातील वात्सल्याच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा हा 'एक अतिशय प्रसिद्ध व थोर अनुभूतीचा अभंग आह बाळाने आपणास लागलेली तहान भूक बाईस सांगावी फक्त त्याला पुढल्या उपायाचे चिंतन करण्याचे काय कारण आहे ? आईच त सर्व पाहणार नाही का? खरे म्हणजे मुलास लागलेली भूक आईसच समजते आधी कारण तिचे त्याकडेच सारखे लक्ष असते तुकाराम महाराज म्हणतात, या आईच्या वात्सल्याने परमेश्वराने आपले पालन करावे ईश्वरास, विठ्ठलास आई म्हणून सबोधण्याची रीत फार पूर्वीपासून साधुसतांनी सुरू केलेली आहे बाप, बधू, पत्नी इत्यादी नात्वात थोडासा दूरत्वाचा अश उरतो पण आईचे नाते असे आहे की, त्यात उभयताना कसलाच सकोच धरणे आवश्यक नसते सहजसुलभ असा हा निर्व्याज प्रेमाचा आविष्कार असतो आईवर रागवावे, रुसावे, तिच्याशी भाडावे, तिच्या मांडीवर बसावे, तिच्याजवळ हट्ट करावा, तिचा पदर धरावा, हे सब लडिवाळ प्रकार फक्त आईच्याच नात्यात सभवतात, म्हणून तुकारामबुवासारख्या थोर भक्ताने विठ्ठलास आई म्हटले आहे माउली म्हणूनच तिची आळवणी केली आहे पंढरपूरच्या सप्रदायात याच वात्सल्याच्या भावनेने सर्वत्र विठ्ठलाची उपासना चालू आहे विठ्ठल आपली आई व आपण त्याचे लाडके, हट्टी, चुवणारे एक मूल या वात्सल्यभादावरील तुकोबांचे अनेक अभग आर्ततेने चित्त झालेले बाहूत भक्तीच्या सहजभाव्य अशा आविष्कारांत डोळ्यात अश्रू येणे, ऊर भरून येणे, अष्टसात्त्विक भाव जागृत होणे व हृदय द्रवून जाणे, विरघळून जाणे, याचा अनुभव तुकाराम महाराजांच्या या भावावरील निश्चयाने येतो ससारतापाने त्रस्त झालेल्या, रोजच्या व्यवसायातील चिंतांनी खगलेल्या, मानसिक चिंतानी ग्रस्त झालेल्या माणसांस तुकाबांचे हे अभग म्हणजे एक प्रकारचे श्रेष्ठ वरदानच होय व्यावहारिक क्षेत्रातील विविध तापाचा उन्हाळा तुकोबांच्या या प्रकारच्या अभगांच्या सान्निध्यात सहज सुखद असा वाटावा तुकोबांच्या या अमृतमधुर व चद्रिवेप्रमाणे शीतल असणाऱ्या वचनांचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायासारखा आहे ज्या तुकोबांनी हा श्रेष्ठ अनुभव भोगला त फारच श्रेष्ठ, पण ज्याच्या कानावर तो अभंगहपांनी पडला व ज्याचे चित्त शात झाले, तेही तितकेच धन्य मानावयास हवेत ससारग्रस्त व तापत्रयाने भयभीत झालेल्या माणसाने डोळे मिटावत, श्रीविठ्ठलाचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि मुखाने उच्चार करावा, 'माये मोकलिले कोठें जाये बाळें ? ', 'मायबापापुढें लाडिके लेकरू । तैंसे बोल करू कवतिके ', 'घेई उचलोनि पुसे तानभूक । पुसी मार्ते मुख पीतांबरें ', 'कोण आम्हा पुसे सिजलें भागले । तुजविण उगले पाडुरगा ?' 'वेडें वाकुडें बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ', 'तू माउलीहून मायाळ । चद्राहूनी शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा, 'नलगे मापेंसी बाळ निरवावे । आपल्या स्वभावे ओडे त्यासी ', 'विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ' अशा सारख्या शेकडो वचनाचा उच्चार मुखातून होत असताना अत करण द्रवून येईल शीतल होईल अपार अस प्रभुप्रेमाचे सुख अनुभवास येईल तुकारामबुवांनी जे भोगले ते थोड्या अशान का होईना पण प्रतीतीस येईल १०३१ जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥ १ ॥ न सपडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ २ ॥ मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥ ३ ॥ सागावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळाचे सार पाप दार्बी ॥ ४ ॥ येचि चिंते माझा करपला भीतर । का नेणो विसर पडिला माझा ॥ ५ ॥ तुका म्हणे तू हे जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - जीवनावाचूनि-पाण्याशिवाय, न सापडे-सापडत नाही, भीतर-मनाचा गाभा अर्थ - पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तसा देवा, तुझ्यावाचून माझा जीव तळमळत आहे हो १ भूमीमध्ये दडलेले धन सापडत नसले म्हणजे जसे लोभी माणसाचे मन तडफडते, तशीच अवस्था माझ्या मनाची झालेली आहे २ आईचा वियोग झालेल्या मुलाचे भन जसे कासावीस होते, तोच कळवळा माझ्या पोटात