भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 517, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 517

सार्थ तुकारामगाथा ४७३ उपभोग काहीच होत नाही. आणि त्याच्या बरोबर असणारास ही त्याच प्रकारचे भोग भोगायला लागतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला खरोखरच एखाद्या गोष्टीचे मर्म माहीत नाही, त्याला हे असे कर्मगतीचे फळ भोगावे लागते. ४ १०५५ समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥ १ ॥ अवगुणी जरी जालें तें घोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि १ मुद्रांकित जालों तुझा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जन-लोक, घोंगळ-वाईट, मुद्रांकित-कृपेने, स्वाधीन. अर्थ :- देवा, एखाद्या समर्थ असणाऱ्या श्रीमंत माणसाचे मूल जर दीनवाणे अथवा केविलवाणे दिसत असेल तर, त्याकडे पाहताच लोक कुणाला हसतील? त्याच्या आईबापासच बोल देतील, नाही का? याचा विचार तुम्ही केला आहे? १ ते मूल कितीही अवगुणी असेल व कितीही वाईट असेल, तरी त्यांना त्याचा सांभाळ करावा लागतोच. २ तुकाराम महाराज म्हणतात, तसा मी एक पतित असून देवा, त्याची चिंता तुला असावी, कारण मी तुमच्या पतितपावन या मुद्रेने अंकित झालो आहे. तुमच्याच स्वाधीन आहे ३ १०५६ गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें २ भेटी केली तेणें ॥ १ ॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ २ ॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मणि-रत्न, खळा-दुष्टास अर्थ :- एखाद्या गाढवाच्या अंगाला चांगली चंदनाची उटी लावली तरी त्याचा त्याला काय उपयोग ? ते लागलीच नेहमीच्या स्वभावाप्रमाणे राखेत जाऊन लोळणारच. १ ज्याचे जे सहज स्वभावातील गुण असतील ते काही बदलत नाहीत. २ एखाद्या माकडाच्या गळ्यात जर किंमतवान रत्न बांधले तर त्याचा त्याला काय उपयोग? ते त्याचे तुकडे तुकडे करून चघळूनच टाकणार ना? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे दुष्ट माणसास फार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्याला आवडत नाहीत. आपल्याच मताने ते अज्ञानाची गोष्ट वाढवितात ४ १०५७ नेणे सुनैं चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥ १ ॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेलें वांयां बोल जातो ॥ २ ॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥ ३ ॥ वंदूं निंदूं काय दुराचार ३ । खळाचा विचार तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुनैं-कुत्रे, ढाळ-खोड, वागण्याची रीत अर्थ :- दारात बांधलेले कुत्रे चोर कोण, पाहुणा कोण, हे न ओळखता सर्वावरच भुंकत राहते ? त्याला कितीही शिकविले तरी त्याचा काही उपयोग त्याला कधी होत नाही. त्याला शिकविले ते सर्व वायाच जाते. २ त्याला जरी चांगले दूध पाजले तरी, ते ओकून टाकून अमंगळ अशा घाणेरड्या पदार्थाकडेच त्याचे लक्ष जाणार. ते आपली खोड काही सोडायला तयार नसते. ३ त्याचप्रमाणे एखाद्या दुष्टाला कितीही वंदा अथवा निंदा, त्याच्या स्वभावात काही कधी फरक होणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ १०५८ जन मानवलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥ १ ॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ २ ॥ १ दास, २ राख तया तेणे केलीसे भेटी, ३ दुराचारी थोर. तु. गा -.६०

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 517, कुल 611 में से · BharatKosha