सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 533, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४८७ आविसें मीन लावियेला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥ ३ ॥ पक्षी पिलयां पातले आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण न भेये धांवोनि घोसरे । जीवित ना जालीं वाळें ॥ ४ ॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडी । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धांव घालीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- फांदा-पाश, वरो-अवस्था, आविसे-आमिषाने, रया-रक्षण. अर्थ :- गारुड्याची पुंगी वाजत असताना सर्प त्या नादास भुलला. त्याच वेळी त्या गारुड्याने त्याच्यावर पाश टाकून त्याला पकडले. सर्पास पेट्याऱ्यात कोंडून दारोदारी तो हिंडतो व आपले पोट कसे तरी भरतो. काय त्या सर्पाची किंमत असते ? १ पांडुरंगा, माझीही अशीच अवस्था झाली आहे. मीही आता या संसारपाशात गुंतून गेलो आहे. मला आता त्यातून तू सोडव. तू जर कृपा केली नाहीस, तर माझे काहीच चालणार नाही. अशी स्थिती झाली आहे. २ मासे धरणाऱ्या कोळ्याने मासे पकडण्यासाठी गळाच्या टोकास एक लहान मासा आमिष म्हणून लावला. पाण्यातील माशाने ते चांगले भक्ष्य म्हणून तोंडात धरण्याचा प्रयत्न केला व त्यातच तो सापडला. मग कोळ्याने त्या माशास बाहेर काढून त्याचा प्राणच घेण्यास सुरुवात केली. तेथे त्याचे रक्षण करणारे कोण आईबाप आहेत ? ३ घरट्यात असणाऱ्या आपल्या लहान लहान पिल्लांना पारध्याने पाशात पकडले आहे, असे मोठ्या आशेने आलेल्या त्यांच्या आईबाप पक्ष्यांनी पाहिले. मग त्यांनी मरणाची फिकीर न करिता मायेने, पिल्लांवरील प्रेमाने त्यांनी त्या जाळ्यात उडी घेतली. त्यामुळे त्यांची मुलेही वाचली नाहीत व त्यांचे जीवनही संपले. तेही पारध्याच्या हाती पिल्लां- सहित सापडले. ४ गुळचट असणाऱ्या पदार्थावर माशी भुलली व तेथेच गुंतून राहिली. निसटण्यासाठी तिने आणखी फडफड केली, तो ती अधिकच चिकटून राहिली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ही अशी आशा माझाही प्राण घेऊ पाहात आहे. पंढरीनिवासा, पांडुरंगा, तू आता माझ्यासाठी धावत ये. ५ १०१३ यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥ १ ॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ २ ॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामध्यें होता गांठी ॥ ३ ॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्वळा काय चाड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- यातिहीन-हीन जातीचा, होन-द्रव्य, चाड-इच्छा. अर्थ :- देवा, मी तर हीन जातीचा असल्याने मला कसला आला आहे अभिमान ? नारायणा, तुम्हास मात्र सर्व लोक मानतात. १ मला मान नाही, याची कसलीच चिंता वाटत नाही. कसलेच सुखदुःख नाही. जो तो आपल्या गुणांप्रमाणे मान सन्मान होतोच. २ एखाद्या चिंधीत जर द्रव्य बांधले असेल, तर ती चिंधी त्या द्रव्यासाठी मस्तकावर धारण केली जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला वंदन करतात, मानसन्मान देतात, तो निराळाच आहे. मला दुबळ्याला मानाची काहीच चिंता नाही, इच्छा नाही. ४ १०१४ शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥ १ ॥ जाऊनि वोसंगा रिघेन वोरास । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ २ ॥ कृपा तनु माझी सांभाळी दुभूनि । अमृतजीवनें लोटलीसे ॥ ३ ॥ आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥ ४ ॥