भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 549, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 549

सार्थ तुकारामगाथा ५०३ अध्यायात आहे. मन जिंकण्याचे किंवा ताब्यात ठेवण्याचे मुख्य साधन कोणते ? तर अभ्यास व वैराग्य ही दोन प्रमुख साधने गीतेने सांगितली आहेत. अभ्यास म्हणजे कोणतीही गोष्ट पुनः पुनः करणे व वैराग्य म्हणजे, राग, प्रीती, लोभ नसणे, अशी अवस्था होय. पातंजलयोगसूत्रातही ' योगश्चित्तवृत्तिनिरोधः ' म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे, याने नाव योग असे सांगून पुढे ' अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ' अभ्यास व वैराग्य यांनीच या मनाचा अथवा चित्तवृत्तीचा निरोध होतो, असे म्हटले आहे; अशा प्रकारे अतिचपळ असणाऱ्या व आवरण्यास कठीण असणाऱ्या या मनाच्या निरोधाचे उपाय सर्वत्र साधुसंतानी सांगितले आहेत. 'मन आधीं मुंडीं । वासनेतें खंडी । विठ्ठल ब्रह्मांडों एक आत्मा' असे श्रीसोपानदेवांनी या मनाच्या निरोधाविषयी म्हटले आहे. त्यांनीही 'विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य । सोवळा आरोग्य हरि देखा' असेच साधन मनाच्या निग्रहाविषयी सांगितले आहे. 'मन एके ठायीं । राहे ऐसे करों कांहीं । सर्व साधनाचे सार । मनों करावा विचार' अशा शब्दांनी सुरुवात करून एकनाथानी मनास उपदेश केलेला आहे. रामदासाचा मनास उपदेश प्रसिद्धच आहे. ' नका धावू तुम्ही संरा । मना मागे या सत्वरा । मन पैं आधीन । तेणें जोडे संतचरण' असा त्यांनी मनो- जयाचा उपाय व परिणामही सांगितलेला आहे, हे मन किती ओढाळ आहे, किती अस्थिर आहे, किती चंचल आहे, यासबंधीही त्यांनी वारंवार उल्लेख केले आहेत. ' मना तूं अधीर अधीर । बहू पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयैं ॥ किती शिकवावें तूतें नायणसी एकचित्तें । बहू गार्णे बोलता सूं तें । नायणसी पामरा ॥' अशा मनाचे स्वभाववर्णन एकनाथानी केलेले आहे. 'बैसतां निश्चळ । मन करी तळमळ । ध्यान धारणा ते थिथी । मन न पावेचि सिद्धी ' असे हठवादी व दुराग्रही मन प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करते. शेवटी 'तुज सांगतसे मना । पाहे पंढरीचा राणा । नको तुजा छंद कांहीं । राहे विठ्ठलाचे पायीं' असे त्यास सांगून 'मन रामों रंगले अवघे मनाचे राम जाले' असा मनोजयाचा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे 'मन करा रे प्रसन्न । सर्वसिद्धींचे कारण' असा तुकोबाचा अभंग आपणास माहीत आहेच ( क्र. २९१ ) तुकारामबुवांनाही मनाच्या ओढाळ व चंचल स्थितीचा अनुभव चांगलाच आला असावा. ' मन उताविळ । जाले न राहे निश्चळ । मन गुंतलें लुल्या । बाप धांवोनि द्या ठाया ', ' मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एक पळ स्थिर नाहीं ' इत्यादी ओळींवरून तुकोबाच्या आयुष्यातही या मनास जिंकण्याचा संग्राम कसा होत असावा याची कल्पना करता येण्यासारखी आहे. अर्थातच तुकोबानी मनास वैराग्याने, नामस्मरणाने, चिंतनाने एकसारखा अंकुश लावलेला असल्यामुळे, त्यांना ते जिंकता आले, व रोज नव्या जागृतीचा टप्पा गाठता आला, हे स्पष्ट आहे. 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा ' असा त्यांनी आपल्या साधनेचा निष्कर्ष दिलेला आहे. त्यांनीही मनास वारंवार उपदेश केलेला आहे, तोही मार्गदर्शक होण्यासारखा आहे. 'मना एक करो । म्हणे जाईन पडरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळां ।', 'मना सांडि हे वासना दुष्ट सोडी', वगैरे ओळींतून मनास सावरण्याचे प्रयत्नही त्यांनी सुचविले आहेत. ११२४ पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥ १ ॥ पुंडलिकें हाट भरियेली पेठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ २ ॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥ ३ ॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥ ४ ॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ओखदा-औषधासही, हाट-बाजार, उदमासी-व्यापारास, धणी-तृप्ती. अर्थ :- या पंढरपूर क्षेत्रात दुःख औषधालासुद्धा मिळायचे नाही. नेहमी सर्वत्र प्रेमसुखाचा सुकाळ असतो. १ या पंढरपूरच्या बाजाराची पेठ भक्त पुंडलिकाने भरविलेली असून त्याने वैकुंठाबरोबरच विठ्ठलही आणून