भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 551, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 551

सार्थ तुकारामगाथा ५०५ लूट वेगार नाहीं असे तुकोबा सांगतात द्वारकेहून हा श्रीकृष्णरूपी माल पंढरपूरच्या पेठेत सर्वांनाच पसंत पडलेला आहे साऱ्या भक्तांनी याला मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे मोजमाप कुणासही करता आलेले नाही अशा प्रकारे व्यापाऱ्याच्या भाषेत या विठ्ठलरूपी मालाचा सौदा पटविण्याची भाषा या अभंगातून आहे भक्तांना विस्तार देऊन गुंतविल्यामुळे या पांडुरंगास परत द्वारकेस जाताच आले नसल्याचेही तुकोबांनी मार्मिकपणे नमूद केले आहे या द्वारकेच्या राण्यामुळे सर्वच संतांना पंढरपूरविषयी फार मोठा जिव्हाळा वाटतो ज्ञानेश्वरनामदेवाच्या आधीपासूनच पंढरपूर व श्रीविठ्ठल याचा महिमा गाजत असला तरी माहात्म्यवर्णनास खरा प्रारंभ संतांच्या वाट- मयांतूनच होत राहिला श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या क्षेत्राबद्दल आपल्या एका अभंगात म्हटले आहे, 'धणतीर्थ पंढरी। भूर्वकुंठ महीवरी। भक्त पुंडलिकाचे द्वारीं। कर कटावरी राहिला 'पुन दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, 'पंढरीसी कीर्तन करी। पुंडलिकासी नमस्कारी। विठ्ठलचरण अंतरी धरीं। धन्य जन्म तयाचा' ज्ञानेश्वरनामदेव यांच्या काळा- पासून या पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य विशेष रूपाने गर्जत राहिले पंढरपूर हे क्षेत्र म्हणजेच या भूमीवरील वैकुंठनगरी असे सर्वांचीच समजूत आहे नामदेव हही धंद्याने व्यापारी व दुकानदार, त्यांनीही तुकोबाप्रमाणेच 'इनामाची भरली पेठ । भूर्वकुंठ पंढरी' असे म्हटले आहे या क्षेत्रात सर्व पातकांचा नाश होतो येथील देवळे पाषाण, तृण या सर्वांनाच देवाचेच स्वरूप प्राप्त झालेले असते अशा नामदेवाची साक्ष असून 'अनंत तीर्थांचे माहेर । अनंत रूपाचे सार ।' म्हणजे हे पंढरपूर असे त्यांनी म्हटले आहे 'झळझळित सोनसळा। कळस देखिला सोवळा। वरचे वरचें पंढरपूर । विठोबारायाचे नगर', 'सर्व सुखरासी भिवरेच्या तिरीं । आमुची पंढरी कामधेनू' अशा शब्दात नामदेवांनी पंढरीचे वर्णन मोठ्या काव्यमय भाषेत केले आहे त्यांनाही या क्षेत्रापुढे भुक्तिसुख अथवा ब्रह्मसुख याची पर्वा नाही त्यांनी एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'आम्हीं स्वर्गसुख मानू जैसा ओव। देसोनियां सुख पंढरीचे। नलगे वैकुंठ न वाटू कैलास। सर्वस्वाची आस देवापार्थी।' तुकारामबुवांचेही अनेक अभंग पंढरपूरचे माहात्म्यवर्णन करणारे आहेत 'आमुची मिरास पंढरी। आमुचे घर भीमातीरीं', 'पंढरीये माझें माहेर साजणी। ओवीये कांडणीं गाऊ गीत', 'पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे', 'पंढरीचा महिमा। देता आणीक उपमा। ऐसा ठाय नाहीं कोठें। देव उभाउभी भेटे' इत्यादी शब्दात या पंढरपूर क्षेत्राचे वर्णन तुकारामबुवांनीही केलेले आहे

११२७ विचार नाहीं नर खर तो जैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥ १ ॥ वादावाद करणे त्यासी तोच वरी । गुखाडोची चाड सरे तोच बाहेरी ॥ २ ॥ सौभाग्यसंपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ। चिकरूनि १ साठी पाया लागली ते विष्ठ ॥ ३ ॥ नाही याति कुळ फांसे ओढी तयासी। तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खर-गाढव, लगड-ओझे, गुखाडीची-घाणेरड्या जागेची, चाड-किंमत अर्थ - ज्या माणसाला परमार्थाचा विचारच माहीत नाही, तो मनुष्य असूनही गाढवाप्रमाणेच होय उगाच पाठीवर ब्रह्मज्ञानाचे ओझे वाहणारा मात्र तो समजावा १ बाहेरच्या घाणेरड्या जागेची सवय असल्याप्रमाणे त्याला नेहमीच वादविवाद करणे आवडते २ अशा प्रकारचा मनुष्य, मग तो जरी भाग्यवान, धीमंत, वृद्ध, प्रतिष्ठा- वान असला तरी त्याचा धिक्कार पायास लागलेल्या विष्ठेप्रमाणे करावा ३ जो नुसतेच फांसे ओढतो, त्याला याती, कूळ यांची प्रतिष्ठा कधीच नसते तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच्या माळामुद्रांच्या सोंगाला काय जाळायचेय ? ४

११२८ देव होसी तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ १ ॥ दुष्ट होती तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ २ ॥ तुका म्हणे जे दर्पणीं विवळे । ते तया वाणलें निश्चयेंसों ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आणिकांते-इतरांना, दुसऱ्यांना, दर्पणीं-आरशामध्ये

१ चिक्करूनि तु गाथा ६४