भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 59, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 59

शब्दार्थ व टीपा :- लौकिक-बाह्य अवडंबर, साच-खरा, अतिशया-अति हव्यास, लौकिकाची हाव अर्थ - देवाची पूजा करायची असेल तर ती मनातल्या मनातच करावी हे उत्तम. येथे बाह्य अवडंबराची काय जरूरी आहे ? १ अशी मानसिक पूजा ज्या ईश्वरास पोचावयास हवी, त्यास समजावयास हवी त्यास ती बरोबर पोचते, समजते अंत करणातील खरा भाव खरोखरीच उपयोगी पडतो २ बाह्य डामडौलाचा हव्यास फार धरला तर कधी लाभ व कधी हानीही होईल कारण ज्या जातीचे बीज चिंतात असेल त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते आपल्या अंत करणातील भावाप्रमाणे आपणास फलप्राप्ती होईल ३ तुकारामबुवा म्हणतात, ज्या भजनामुळे मनास खरे समाधान मिळते त्याच्या योगानेच संसारातून पैलतीराला जाण्याचे करावे ४ विवरण - मनात देवाविषयी प्रीती नसताना गंध, धूप, दीप, फुले, आरती, नैवेद्य या बाह्य थाटान पूजा केली तरी देव प्रसन्न होणार नाही त्यास फक्त भक्ताच्या मनातील भाव दिसतो मानसिक पूजा तुकारामबुवाना यासाठी श्रेष्ठ वाटते मनच भगवंताला अर्पण करून सर्व कर्मे करीत राहणे हीही एक प्रकारची पूजाच, आपले मन व त्याच्या सर्व वृत्ती हरिरूपच आहेत असे समजून वृथा बाह्य अवडंबर माजवू नये कारण या बाह्य देखाव्याने ईश्वर संतुष्ट होत नाही त्यास आपल्या मनाची निर्मळता व समर्पित अवस्था याची गोडी असते 'मनीं भाव असे काहीं । तेथें देव येती पाहीं' असे दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे आणखी एका अभंगात त्यांनी म्हटले आहे, 'मनोमयपूजा । हेंचि पदिये केशीराजा' या पंढरीरायाला भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम हवे त्याला गंध, अक्षदा, सुवासिक पुष्प, भरजरी वस्त्रे, मोल्यवान अलंकार याची जरूरी नसून भक्ताचे मनापासूनच प्रेम तवढे हवे असते 'देव भावाचा भुकेला' हेच खरे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ज्ञानदेवांनी भगवंताच्या या आवडीचे मोठे रसाळ वर्णन केले आहे मनामधील नि:सीम भावाने एखादे फळ, फूल, पान जरी अर्पण करणारा भक्त असला तरी परमेश्वर संतुष्ट होतो आणि यापैकी काहीच मिळाले नाही तर पाण्याचा थेंबसुद्धा पुरेसा होतो या भक्तीच्या प्रेमाचा देव भुकेलेला असतो 'आम्ही भावाचे पाहुणे' असे खुद्द भगवंतानीच मागितले आहे मनानेच ईश्वराची पूजा कधी न जमली तर काय करावे याचेही सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात केले आहे सर्व वृत्तीसहु मन ईश्वराशी निगडित करणे हे प्रथम कठीण वाटेल मग एखादे निमिष जरी ईश्वराच्या स्मरणात खर्च केले तरी चालेल, किंवा मनाने, वाणीने ज्या ज्या क्रिया होत आहेत त्या 'मी करतो आहे' असे असे मानू नये ज्याच्या स्फूर्तीने विश्वाचे चलनवलन होते, तेथे आपण कोण ? असाच भाव असावा बाह्य देखाव्याचा ईश्वराच्या भक्तीत काही उपयोग नसून स्वतःच्या मानसिक वृत्तीच हरिरूप बनल्याची जाणीव करून घेणे हीच सर्वोत्तम पूजा होय ७२ एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होइल नेणो ॥ १ ॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ २ ॥ हरिहरा नाहीं बोटभरी वाती । कोण त्याची गति होइल नेणों ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्याची गति होइल नेणो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गति-परिणाम अखेरी, बहिर्मुखं-बाह्य उपचारावर लक्ष देणारे, वाती-वात, आरती अर्थ - जे लोक एकादशी अथवा सोमवारचे व्रत करीत नाहीत त्यांच्या आयुष्याची काय अखेरी होईल हे समजत नाही १ या सर्व लोकाकडे पाहून मनाची फार तळमळ होते, कारण सर्व माणसे आंधळी आहेत बाह्य कर्म- काडावर त्याचा भर आहे त्यांची वृत्ती बहिर्मुख आहे २ विष्णू किंवा शंकर यांना बोटभर वातीनेही जे ओवाळीत नाहीत, आपले प्रेम व्यक्त करीत नाहीत त्यांची गत काय होणार कुणास माहित ? ३ ईश्वरावर ज्यांचे प्रेम नाही त्यांचे आयुष्य सुखाचे कसे होणार याबद्दलची चिंता तुकाराम महाराजांना वाटते ४ विवरण - कोणत्या तरी देवास भजा, त्याचे स्मरण करा म्हणजे तुमच्या जीवनाचे सार्थक होईल या उपदेशाबरोबरच आणखी एक महत्वाचा सिद्धान्त बुवांनी या अभंगात सांगितला आहे धुवा भागवत संप्रदायातील, वारकरी पथातील त्याचे दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हा विठ्ठल श्रीविष्णू किंवा श्रीकृष्ण होय एकादशीचे व्रत हे या तु गा ५