सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 60, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३४ सार्थ तुकारामगाथा
पंथात प्रमुख; पण तुकाराम महाराज या ठिकाणी सोमवारही करायला सांगतात, यातले रहस्य काय ? कोणत्याही देवाची पूजा करा, स्मरण करा, स्तवन करा, ते एकाच परमेश्वराला पोचते अशी आपली परंपरा आहे. शिव, विष्णू ही नांवे दोन पण दैवत एकच अशीच वारकरी पंथाची धारणा आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा शिवाशी संबंधित आहेच. त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. ‘ विठोनें शिरीं वाहिला देव राणा ' म्हणून समर्थ रामदासांनी विठ्ठलाचे स्तवन केले आहे. हरिहरांचे ऐक्य हे वारकरी पंथाचे एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य मानावे लागेल. दैवतांवरून मतभेद व भांडण या बाबी वारकरी पंथात दिसत नाहींत मुख्य भर विठ्ठलावर असला तरी तोही शिवस्वरूपच संतानी मानला आहे हरिहरात केवळ एका बेलाटीचा फरक आहे असे एके ठिकाणी बुवांनी म्हटले आहे. विष्णू व शिव, हरि व हर यांच्यात वरवरचा भेद असला तरी ‘ मज उभयरूपां एक ' असे तुकारामांनी सांगितले आहे. 'हरिहरां भेद । नाहीं करूं वाद । एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं' अशी मोठी गोड अनुभूती तुकारामांनी वर्णन केली आहे आणि म्हणून हरीला किंवा हरला, कुणाला का होईना पण थात लावा, त्याचे स्मरण करा असे बुवा आग्रहाने सांगत आहेत तुकोबांच्या घरी कुलदैवत म्हणून शिवाचीही उपासना होतीच हरिहरेश्वराचे देऊळ अद्यापही त्यांच्या जागेत आहे ( अभंग क्र. १२४ वरील अधिक विवरण पाहावे )
७३ नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥ १ ॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ २ ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥ ३ ॥ तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- आराणूक- शांती, समाधान, सुख, सांदीं- कोपऱ्यात अर्थ.- केवळ संसार करणाऱ्या प्रापंचिकास कधीही समाधान मिळणार नाही; कारण त्याच्या चित्तात नेहमी धंदा, व्यवसाय याचाच ध्यास असतो. त्यास शांती कुठली ? १ अशा रीतीने सर्व चित्तच संसारात व्यग्र झाल्यावर मग देवधर्म सांदोकोपऱ्यात पडतात, त्यांची आठवणही कुणास होत नाही, कारण एकसारखे विविध विषयांचे चिंतन व त्याचाच गोंधळ मनात गाजत असतो. २ आणि कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे समाधान रात्रंदिवस कितीही केले तरी ते पुरे पडत नाहीं; पण त्यामुळे मात्र ईश्वराकडे दुर्लक्ष होऊन त्याचे दर्शन घेणेही दुर्लभ होऊन जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे संसारग्रस्त लोक आत्मघातकीच असतात. नारायणाच्या ठिकाणीं तयांचे चित्त लागत नाही ही त्यांची मोठी चूक होत आहे. ४
७४ स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥ १ ॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ २ ॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- ग्रामवासी- गावचे लोक, श्वान- कुत्रे, लिंग- शिव, अतित- अतिथी, थारा- विश्रांती, कंटक- दुसऱ्याला त्रास देणारे लोक, कुळवाडी- वतनदारी अर्थ - ज्या गावचे लोक परमेश्वराची सेवा व भक्ती करीत नाहीत ते गाव व त्याच्या भोवतीची जागा स्मशानासारखी समजावी व त्या गावातील माणसे जिवंत असली तरी प्रेतरूप मानावीत. १ कसला तरी धंदा करून कुत्र्याप्रमाणे ते पोट भरतात एवढेच, पण त्यांच्या घरी यमदूतांची वस्ती असते. मृत्यूच्या पथाराच त्यांचे वागणे लागलेले असते. २ जेथे लिंगाची म्हणजे ईश्वराची पूजा होत नाही, तेथे अतिथीही आश्रयास, विश्रांतीस धावत नाही या गावात वस्ती फक्त चोरांची व समाजकंटकांचीच असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या बुद्धीला आपण कोण, आपली स्थिती काय याविषयी काहीच जाणीव नाही तेथे निश्चितपणे यमाची वतनदारी सुरू झालेली असते. ४