भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 87, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 87

सार्थ तुकारामगाथा ५९ त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळे भोगावी लागतील इ आशेच्या लोभाने जे लोक करू नये तो कर्म करतात ते नरकासच जातील असे तुकाराम महाराज म्हणतात ४ १२४ हरिहरा भेद । नाहीं करूं नये वाद ॥ १ ॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ २ ॥ भेदकासी नाड । एक वेलाटीच आड ॥ ३ ॥ उजवे वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरि व हर-विष्णू व शंकर, नाड-अडचण, वामांग-डावे अंग अर्थ - विष्णू व शंकर एकच असल्याने या विषयी वाद करू नये १ शंकराच्या हृदयात विष्णू व विष्णूच्या हृदयात शंकर आहे गोडी जशी साखरेसी एकजीव झालेली असते तसे हे ऐक्य असते २ फरक करणाऱ्याला अडचण फक्त एका वेलांटीचीच दिसून येते ३ पण तुकारामबुवा म्हणतात, डावे अंग काय, उजवे काय, दोन्ही एकच होत ४ विवरण - प्राचीन धर्मग्रंथात व पुराणात अनेक ठिकाणी विष्णू व शिव अथवा हरी व हर यांच्यात अभेद वर्णन केला आहे शिव व विष्णू हे परस्परांची उपासना करणारे आहेत वैकुंठ चतुर्दशीला शिव विष्णूची पूजा करतात व शिवरात्रीला मध्यरात्री विष्णू शिवाची पूजा करतात दोन देवतांची नावे वेगळी असली तरी त्यांच्यात भेद नाही अशीच शिकवण वारकरी संप्रदायाचीही आहे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, विष्णू जगाचे पोषण करतो विश्वाचा संहार करून शिव दुष्ट शक्तीचा नाश करून मंगल साधणारा आहे या त्रिमूर्तीचे ऐक्य मार्कंडेय पुराणात अध्याय ४६ मध्ये व भागवतात चौथ्या स्कंधात अध्याय ७ श्लोक ५०-५४ मध्ये वर्णन केले आहे ' य शिव सच वै विष्णूर्य्या विष्णू सच वै शिव ' असे शिव व विष्णू यांचे ऐक्य हरिवंशात वर्णन केले आहे ' शिवस्य हृदय विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिव ' अस म्हटले आहे ' स ब्रह्मा स शिवः सेंद्र सोक्षर परम स्वराट् । स एव विष्णु स प्राण स कालोऽग्नि स चंद्रमा । स एव सर्वं यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् ' असे ऐक्य कैवल्योपनिषदात वर्णन केले आहे असे हे शिव विष्णूचे ऐक्य प्राचीन कालापासून मानले गेले आहे महाभारतात अनुशासन पर्वात उपमन्यूचे आख्यान आहे त्यात जांबवतीला पुत्र व्हावा म्हणून श्रीकृष्णान शंकराची आराधना केली व शंकराची सहस्रनामे श्रीकृष्णाने उपदशिली असे कथन आहे अर्जुनानेही शंकराचीन आराधना करुन पाशुपतास्त्र मिळविल्याची कथा प्रसिद्ध आहे महाभारतात असलेल्या विष्णू सहस्रनामात 'सर्व शर्व शिव स्थाणू ' व ' स्वयम्भू शम्भुरादित्य ' अशी वर्णने आहेत त्याप्रमाणे शिव व विष्णू या दोन देवता परस्पर भिन्न असल्या तरी त्यांचे ऐक्य सर्वांनाच मान्य आहे असा भेद कोणीही मानू नये असाच स्पष्ट आदेश सर्वत्र दिसतो 'शिव थोर विष्णू लहान । हरि विशेष हर गौण । ऐसे म्हणति जे त्यालागून । आणून नरकी घालाव ' अशी एक ओवी शिवलीलामृतात आहे मराठी संतानी हे हरिहराचे ऐक्य अनेक ठिकाणी आग्रहाने वर्णन केले आहे नावे भिन्न असली तरी ती एकाच परमेश्वराची रूपे असल्याचा बोध मराठी संतांचा आहे भागवत संप्रदायाचे पहिले उद्गाते श्रीज्ञानदेव यांनी खर म्हणजे या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला पण हे ज्ञानेश्वर स्वतः शिवोपासक अशा नाथ संप्रदायाकडून प्रेरित झाले होते हे आपणास माहित आहे ' आदिनाथ उमाबीज प्रकटेले ' या अभंगात किंवा 'क्षीरसिंधुपरिसरी । शक्तीच्या कर्णकुहरीं ' या ओळीने सुरु होणाऱ्या ज्ञानेश्वरीमधील गुरुपरंपरेच्या ओव्या (अध्याय १८/१७५२ १७६६) या दृष्टीने पाहण्यासारख्या आहेत एकनाथानी श्रीशिवमाहात्म्य विस्ताराने वर्णन करुन पुन हरिहरैक्य म्हणून आणखी काही अभंग स्वतंत्र केले आहेत ' एक ध्याती एकमेका । वेगळे अंतर नोहे देखा । ', 'हराचे चिंतन हरीचे हृदयीं । हरीचे चिंतन हराचे हृदयीं ', 'हरिहरांसी जे करिती भेद । ते भतवादी जाण निषिद्ध । हरिहर एक तेथे नाही भेद । कासयासि वाद मूड जनों । ' इत्यादी ओळींतून एकनाथानी शिव व विष्णू यांचे ऐक्य चांगल्या रीतीन वर्णन के- आहे 'शेवे सारिखे सारिखे, शिव आणि विष्णू सखे ' असे तुकोबांनीही म्हटले आहे शिवविष्णूच्या या ऐक्यप्रतिपादना मागील वारकरी संप्रदयात एकादशीबरोबरच सोमवारचा उपवास करावा असा निर्देश केलेला आहे अभंग क्र ७२ वरील विवरण पाहावे

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 87, कुल 611 में से · BharatKosha