भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 93, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 93

सार्थ तुकारामगाथा ६५

याची सगत फोडून त्याज्यातही तू असाच वियोग घडविलास असे सारी पुराणे सांगतात जगही बोलते ३ शिबी राजा छत्रपती होता आणि सर्व प्राणिमात्रावर तो दयाही करी, पण तू त्याला स्वतःचे मांस तापडीत घालून वजन करायला लावलेंस ४ ह्याच प्रमाणे देवा, रणागणात अर्जुनाशी युद्ध करताना मरणोन्मुख झालेल्या कर्णास तू त्याचे सुवर्णाचे दात तो बाणानी व्यापून गेलेला असताना मागितलेस ५ बळी राजा तर केवढा उदार, सर्वस्व द्यायला नेहमी तयार असे,' त्याने तुला दान देण्यासाठी हात वर केला, तर तू कपट करून त्यालाच पाताळात दडपलेस ६ आणि परमेश्वरा, तू श्रियाळ राजाच्या घरी विचित्र हट्ट धरून धरणे धरिलेंस व त्याच्या मुलास त्याच्या हातून मारविलेस ७ देवा, तुला जे भक्तिभावाने भजतात त्याच्या संसाराची ही अशी अखेर तू करतोस तुकाराम महाराज म्हणतात, आता त्यांना पुढे काय गती देत असशील काही पत्ता नाही त्याचा' ८

विवरण - थोर भक्तांना ईश्वरप्राप्तीसाठी, सत्त्वपालनासाठी, धर्मासाठी किती दुःख भोगावे लागते व परमेश्वरही त्याची परीक्षा कशी पाहतो याचे वर्णन प्राचीन काळचे अनेक दाखले देऊन तुकारामबुवांनी केले आहे हरिश्चंद्र हा सत्यव्रताचा पुत्र अयोध्येचा राजा असून त्याच्या पत्नीचे नाव तारामती विश्वामित्रास स्वप्नात दिलेले वचन खरे करण्यासाठी त्याने राज्य सोडले, नंतर स्वतःस स्त्रीस व पुत्रास एका वृद्ध ब्राह्मणास विकून स्वतःस स्मशानात डोबाघरी पाणी भरावे लागले असा याचा छळ झाला नळदमयंती यांची कथाही अशीच शोकार्तक आहे निषध देशाचा राजा हा नळ, त्याची पत्नी दमयंती हा प्रजेचे पालन उत्तम प्रकार करी अश्वमेधादिक यज्ञ करून याने देवानांही संतुष्ट केले काही थोड्या अपराधावरून याच्या शरीरात बलीने प्रवेश केला व यास द्यूत खेळण्याची बुद्धी झाली त्याची सर्व संपत्ती यात गेली तो एका वस्त्राने नगराबाहेर पडला, दमयंतीही एका वस्त्रान त्याच्याबरोबर आली अरण्यात याचे भुकेने फार हाल झाले, एकदा पक्ष्यानी याचे अर्धे वस्त्रही नेले मग त्यान दमयंती झोपली असताना तिचे अर्ध वस्त्र कापून घेतले ता तिला तिथेच सोडून गेला दमयतीस चेदी देशाच्या राजाची सैरंध्री म्हणून काम करावे लागले अशी संकटे नळदमयंतीवर येत राहिली

शिबी राजा मोठा दयाशील होता याची परीक्षा पाहण्यासाठी अग्नीन कपोताचे व इंद्रान श्येनाचे अशी रूप घेऊन श्येन कपोतामागे लागला. कपोत शिबीस शरण आला श्येनाने कपोताची मागणी केली तेव्हा आश्रयास आल्याचे रक्षण करणार असे त्याने मागितले, पण कपोताच्या ऐवजी तेवढेच मास त्याने आपल्या अगातील वाढून श्येनास दिले कर्ण हा सूर्यापासून झालेला कुंतीचा पुत्र महा पराक्रमी पण सुतीने याचे पालनपोषण न केल्याने हा सूतपुत्र म्हणूनच वाढला अपमानाने व सूडाने याचा स्वभाव नेहमी तप्त राही. हा कौरवाच्या बाजूचा असून भारतीय युद्धात अर्जुनाशी याचे निकराचे युद्ध झाले, ऐन संकटाकाळी याचे सुवर्णाचे दात देवान मागितले अशी कथा आहे बळी हा दैत्याचा राजा धर्माने राज्य करीत होता याचे सर्व हरण करण्यासाठी भगवान विष्णूनी वामन बटूचे रूप घेऊन यास तीन पावलांची भूमी मागितली ती याने दिल्यावर वामन बटू सर्व विश्वास व्यापणारा बनला एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्याने स्वर्ग व तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याने पाताळात दडपून टाकले अशी कथा पुराणात आहे श्रियाळाचे सत्त्व भगवान शंकरानी पाहाण्याचे ठरविले अतिथीचा रूप धारण करून ते ऐन भोजनाच्या वेळी त्याच्या घरा आले त्याने संतुष्ट होऊन या ब्राह्मणाचे स्वात करून इच्छाभोजन विचारले या विचित्र ब्राह्मणाने राजा व राणी चांगुणा याच्या एकुलत्या एका मुलाच्या मासाचे भोजन मागितले ते या उभय तानी देऊन अतिथीस तृप्त केले अशा या भक्ताच्या दुखदायक कथा असल्या तरी त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला होऊन त्यांना सद्गती मिळाली आहे

१३४ चाल फेलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ॥ १ ॥ तुज पापचि नाहीं ऐसे । नाम घेता जवळीं वसे ॥ २ ॥ पंच पातकांच्य फोडी । नामें जळता न लगे घडी ॥ ३ ॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहो ॥ ४ ॥

तु गा ९