सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 360, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंहृदयीं श्रीवत्सलाछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिले लातेचें ॥ ३ ॥ सत्यभामा दान करी । उजूर नाहीं अगोकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥ ४ ॥ राखे दारवटा बळीचा । सारथी¹ जाला अर्जुनाचा । दास सेवकाचा । होय साचा अंकित ॥ ५ ॥ भिडा नो बोलवे पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । का रे न भजा माउली ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आणि-वाढलेले ताट उजूर-सबब, दारवटा-दरवाजा अर्थ - हा विठ्ठल किती दयाळू आहे आपल्या भक्ताची व सेवकांचीही सेवा हा नेहमी करीत असतो त्याचे काही कमी पडलेले त्याला सहन होत नाही त्यांना मदत करण्यासाठी हा देव वाढलेले ताटही बाजूस सारून धावत असतो १ असा हा कृपेचा मोठा सागर आहे हा विटेवर उभा असून याचे हात याच्या कमरेवर आहेत हा अतिशय उदार असून आपल्या भक्तांसाठी प्रकट झालेला आहे २ भृगूने दिलेली लाथ हा प्रेमाने आपल्या हृदयावर श्रीवत्सलाछन म्हणून मिरवीत असतो त्याचा काही त्याला त्रास वाटत नाही त्या लत्ताप्रहाराचेही त्याने सुखच धारण केले आहे ३ एकदा सत्यभामेने श्रीकृष्णाचे दान नारदास दिले, तरी कुठलीही सबब न सांगता नारदाच्याच पादुका डोक्यावर धारण करून या देवाने त्याचा सत्कार केला ४ हा बळीचा दरवाजा रक्षण कर- णारा झाला अर्जुनाचा सारथी हाच होता हा देव खरोखर आपल्या सेवकाचा सेवकच होऊन राहतो ५ मोठ्या संकोचाने हा देव पुंडलिकापाशी बोलला नाही त्याने सुचविल्याप्रमाणे तो पाठीमागे निमूटपणे उभा राहिला तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही प्रेमळ माउली का रे भजत नाहीत ? ६ विवरण - ईश्वर हा आपला मायबाप असून त्यालाच सर्व चिंता असते तो किती कनवाळू आहे व आपल्या भक्तांवर तो कसा प्रसन्न असतो, त्यांना संकटात कशी मदत करतो, त्याचे दास्य तो स्वतः कसे करतो, याची अनेक उदाहरणे साधुसंत आपल्या वाङ्मयात देत असतात या अभंगात दिलेला नारदाची भृगूची अर्जुनाची, बळीची उदा- हरणे सर्वप्रसिद्ध अशीच आहेत ब्रह्मा, विष्णू व महेश यात श्रेष्ठ कोण याचा निवाडा करण्याचे काम भृगू ऋषीवर आले असताना तो श्रीविष्णूकडे आला त्यावेळी विष्णू झोपलेले होते भृगून एकदम आत जाऊन श्रीविष्णूच्या छाती वर लाथ मारली तरी विष्णू काही रागावले नाहीत उलट त्यांनी भृगूस वंदन करुन त्याचा लत्ताप्रहार भूषण म्हणून मिरविला नंतर भृगूने प्रसन्न होऊन सर्व देवात विष्णूच श्रेष्ठ असे म्हटल भृगूची ही लाथच श्रीविष्णूस श्रीवत्सलांछन म्हणून गौरवाची वाटते, अशी कथा पद्मपुराण भागवतपुराण यात आहे ६५३ हरि तैसे हरीचे दास । नाहीं तया भय मोह चिंता आस । होऊनि राहाती उदास । बळकट फास भवतीची ॥ १ ॥ धरूनि पाय त्यजिले जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान । न लगे आन ऐसे जाले ॥ २ ॥ वाव तरी उवडच पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । गिहे तरी वेठीं राबविती ॥ ३ ॥ बळें तरि नागवती फाळा । लोन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥ ४ ॥ १ रथी