सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 540, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४१४ सार्थ तुकारामगाथा
मानणे भाग आहे हवी ती वस्तू निर्माण करण्याची शक्ती याला वरप्रसादामुळे प्राप्त झालेली होती रामाच्या आज्ञेवरून यानेच सेतूवधाचे काम पूर्ण केले, म्हणून या सेतूस नलसेतू असेही नाव आहे या नलाने जाह्नवी नदीत एका ब्राह्मणाचे अनेक शालिग्राम विसर्जन केले होते त्यावेळी त्या ब्राह्मणाने 'तुझ्या हातून पाण्यात दगड तरतील' असा वर त्याला दिला होता म्हणूनच याच्या हातून सेतू पूर्ण झाला रामनाम हे बीजमंत्राने उपयुक्त आहे मनातील सर्व कामना या नामजपामुळे मिडीस जातात, अशुभाचे निवारण होते, संकटाचा परिहार होतो, पातकाचा नाश होतो, प्रत्यक्ष यमाम दरारा वाटतो, वगैरे रामनामजपाचे माहात्म्य संस्कृत, मराठी अशा ग्रंथातून पुष्कळानी वर्णन केले आहे 'एकैकमक्षर पुसा महापातकनाशनम् ' एकाच अक्षर पापनाश करणारे आहे याचे वर्णन केले जाते अशा या रामनामाचा व रामजपाचा प्रभाव किती मोठा आहे, हे अनेक ग्रंथातून व स्तोत्रातून प्रकट झालेले आहे रा या अक्षराचे रहस्य काय ? म या अक्षराचे रहस्य काय ? आकारातील अर्धचंद्र व त्यावरील बिंदू यात 'राम ही अक्षरे कशी आहेत ? यासारख्या रहस्यमय वर्णनाचेही नमुने पुराणातून व उपासनापर वाङ्मयातून पुष्कळ मिळतात ' श्रीराम' मधील श्री म्हणजे लक्ष्मी, राम म्हणजे आत्मा, जयजय म्हणजे ३६ या अंकाचा वाघ, ३६ म्हणजे छत्तीस तत्त्वानी युक्त असणारा हा देह, इत्यादी वर्णने मंत्रशास्त्रास धरूनही पुष्कळानी केलेली आहेत रामनामाचा मंत्रशास्त्रदृष्ट्या जो काय अर्थ होत असेल, तो कितीही महत्त्वाचा असला तरी, भागवत धर्मीय संतानी त्याच्या जपाचे महत्व चित्तशुद्धीसाठी, स्वानुभवाच्या सुखासाठी, नामस्मरणाच्या आनंदासाठी रामनामाच महत्त्व मान्य केले आहे याच हेतूने तुकोबानी 'रामनामाचे पोवाडे । अखंड ज्याची वाचा पडे । धन्य तो एक संसारी रामनाम जो उच्चारी' (अभंग क्र ४४४१ ) अशा शब्दात रामनामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे मागे ४१२ क्रमांकाच्या अभंगात 'रामनाम दोन्ही अक्षरें । सुलभ आणि सोपारें' म्हणून जो उल्लेख केलेला आहे तोही याच संदर्भात महत्त्वाचा मानावा लागेल याच भूमिकेवरून साधुसंतानी रामाचे व रामनामाचे महत्त्व मानले आहे तो विठ्ठलाहून वेगळा नाही त्याच्याच नावाशी रामनाम जोडून देऊन एकत्वाचाही बोध सहजगत्या देण्याचा प्रयत्न संताचा होता दैवत नामरूपानी भिन्न असले तरी, बोधाने, तत्त्वरूपाने त्याचे स्वरूप एकच होते याच दृष्टीने एक नाथानी 'भावार्थरामायणा' सारखा ग्रंथ लिहिलाच, 'श्रीरामनाममहिमा' असे एक स्वतंत्र प्रकरण रामनामाच्या माहात्म्यासाठी लिहिलेले आहे त्यात 'सोपारे मंत्र राम अक्षरें दोन्ही । जपता चुके आयनी चौऱ्याशीची', 'सुख रामनामें अपार । शंकर जाणे तोचि विचार', 'रामनाम उच्चार होतों । संसाराशी होय तुटी', 'धन्य मज रामनाम । उच्चारिता होय सकाम', 'जपता रामनामावळी । महादोषा होय होळी' यासारख्या अनेक ओळींतून एकनाथानी रामाचे माहात्म्यकथन केले आहे 'रामकृष्णहरि' याच एका बीजभूत मंत्रात वारकरी पंथीयाची सर्व साधना एकवटलेली आहे यातील मर्मही हेच होय की राम व कृष्ण हे एकच व त्याच्या नामजपाने नामस्मरणाने सर्व काही साध्य होते, अशी त्याची निष्ठा होती ईश्वरापेक्षाही त्याच्या नामाचा महिमा कित्येकदा संतानी मोठा मानलेला आहे
श्लोकरूपी अभंग— ६
११०९ तुजवाचुनी मागणे काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पूरवू कोण जाणे । तुजवाचुनी होत का रावराणे ॥ १ ॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोका । भवतारकू तूजवाचुनि एका । मनीं मानसीं चिंता रूपनाम । पळे पाप ताप भयें नास' काम ॥ २ ॥ हरी नाम हे साच तूझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करू मुखवाणी कैशी देशधडी । तुजवाचुनि वाणिता व्यर्थ गोडी ॥ ३ ॥
१ नासे काम