भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 102, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 102

घेऊन शिवाजीला विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान याने २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखानाला माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला. पोर्तुगीज आणि शिवाजी पोर्तुगिजांनी गोव्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवाय कोकणातील वसई हे मोक्याचे केंद्र ही त्यांच्या ताब्यात होते. आधुनिक सुसज्ज आरमार पोर्तुगिजांकडे असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यांवर त्यांचे वर्चस्व होते. मुघलांनी पोर्तुगिजांच्या समुद्र वर्चस्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली होती. शिवाजीने आपले आरमार उभारण्यासाठी प्रारंभी पोतुगिजांचीच मदत घेतली होती. परंतु जेव्हा शिवाजीचे आरमार तुल्यबळ होऊ लागले, तेव्हा पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी शंका वाटू लागली. आपले लहानसे राज्य सुरक्षित राखण्यासाठी एतद्देशीय राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे पोर्तुगिजांचे धोरण होते. त्यामुळे कधी कधी त्यांना दुटप्पी वर्तन करावे लागे. मुघल आणि आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध असताना पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबरही वरकरणी मित्रत्वाचे संबंध जोडले होते. परंतु शिवजीच्या शत्रूंना आपल्या प्रदेशात आश्रय देऊन त्यांना मराठ्याच्या विरुद्ध चिथावणे शिवाजीविरुद्ध अप्रत्यक्षपणे सिद्दींना मदत करणे,त्यांना शस्त्रात्रे पुरविणे यासारख्या कारवाया पोर्तुगीज करीत असत. ज्यावेळी शिवाजीने दंडाराजपुरीस वेढा घातला होता, त्यावेळी पोर्तुगिजांनी धान्य आणि दारूगोळा यांची मदत सिद्दींना केली. पोर्तुगिजांच्या या दुटप्पी धोरणाचा शिवाजीला चांगलाच अनुभव आलेला होता. मुळातच विदेशी व्यापाऱ्याविषयी शिवाजीचे मत प्रतिकूल होते. संधी येताच हे विदेशी व्यापारी ताब्यात आलेल्या प्रदेशावर घट्ट पाय रोवून बसतील आणि पुढे कोणत्याही परिस्थितीत हाती आलेले ठाणे सोडणार नाही अशी शिवाजीची धारणा होती. त्यामुळे पोर्तुगिजांवर शिवाजीचा अजिबात विश्वास नव्हता तरीपण प्रसंगी पोर्तुगीजांना चुचकारून ९६ छत्रपती शिवाजी महाराज