भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 104, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 104

फेब्रुवारी १६७० मध्ये सलोख्याचा तह झाल्यानंतर काही काळ पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात कोणताही तणाव नव्हता पण १६७४ मध्ये एका विशिष्ट घटनेमुळे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तणाव निर्माण झाला. १६७४ मध्ये शिवाजीने रामनगरच्या कोळी राजावर स्वारी करून त्याचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले. हा रामनगरचा कोळी राजा दमण भागात पोर्तुगिजांकडून चौथाई घेत होता. तो हक्क आपल्याला मिळावा म्हणून पोर्तुगिजांकडून शिवाजीने मागणी केली. नाईलाजाने पोतुगिजांनी हा अधिकार मान्य केला. पण १६६९ मध्ये रामनगरच्या राजाने आपला गेलेला प्रदेश मराठ्यांकडून जिंकून घेतला. तेव्हा पोर्तुगीजांनी दमण मधील चौथाईचे हक्क रामनगरच्या राजाला दिले. तेव्हापासून शिवाजी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. हा तणाव पुन्हा संपलाच नाही. शिवाजीची भिती पोर्तुगिजांना शेवटपर्यंत वाटत होती. शिवाजीचा मृत्यू झाल्यावर पोर्तुगीज व्हाइसरॉयने लिहून ठेवले की, 'हे राज्य आता काळजीतून मुक्त झाले. युद्धापेक्षा शांततेच्या प्रसंगी शिवाजी अधिक भीतीदायक होता.' वाक्यावरून पोर्तुगीज शिवाजीची दहशत बाळगून कसे होते याची चांगली कल्पना येते. शिवाजी आणि इंग्रज पाश्चात्य वखारवाल्यांतही इंग्रज वखारवाले अत्यंत धूर्त आणि एतद्देशीय राजकारणाविषयी सावध होते. १७व्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीने भारताबरोबर व्यापारी व्यवहार करण्यासाठी मुघल आणि दक्षिणेतील राज्यकर्त्यांकडून परवाने मिळविले. या इंग्रज कंपनीने भारताच्या पश्चिम आणि पूर्व या दोन्ही किनाऱ्यांवर वखारी स्थापन केल्या त्यापैकी सुरतेची वखार चांगलीच भरभराटीस आली होती. कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी कंपनीच्या व्यापारी वखारी होत्या. कंपनीचे भारतातील अधिकारी कंपनीच्या संचालकाबरोबर व्यापाराच्या संदर्भात, आर्थिक प्रश्नाच्या संदर्भात किंवा कंपनीच्या प्रशासनाच्या संदर्भात पत्रव्यवहार करीत असत. हा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध असून तो फॅक्टरी रेकॉर्ड या नावाने प्रसिद्ध आहे. या पत्रव्यवहारामध्ये भारतातील स्थानिक राजकारणाविषयी,तसेच इतर पाश्चात्य वखारीच्या हालचालींविषयी, काही ठिकाणी माहिती आलेली आढळते. त्यादृष्टीने फॅक्टरी रेकॉर्ड भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन मानले जाते. शिवाजी महाराजांचा उदय झाल्यानंतर, विशेषतः विजापूरच्या मातब्बर सरदार अफजलखान याचा महाराजांनी वध केल्यानंतर कंपनीच्या पत्रव्यवहारामधून ९८ छत्रपती शिवाजी महाराज