भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 105, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 105

महाराजांसंबंधी वारंवार उल्लेख येऊ लागले. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी कोकणचा काही भाग जिंकून स्वराज्यात समाविष्ट केल्यानंतर इंग्रज वखारवाल्यांशी त्यांचे प्रत्यक्ष संबंध येऊ लागले. इंग्रजांशी पहिला संघर्ष अफजलखानाच्या वधापूर्वी त्याच्या मालकीची तीन जहाजे दाभोळ बंदरात माल घेऊन आलेली होती. शिवाजीने जेव्हा दाभोळ बंदर जिंकून घेतले तेव्हा खानाचा मुलगा फाजलखान याच्या आदेशाप्रमाणे ती जहाजे राजापूरकडे गेली. राजापूरला इंग्रजांची वखार होती. राजापूर सुभ्यावर आदिलशाहीतर्फे अब्दुल करीम हा सुभेदार होता. जहाजावरील माल उतरून घेण्यासाठी फाजलखानाने सुभेदारास लिहिले. परंतु दरम्यान बंदरात आलेली ही तीन जहाजे इंग्रजांनी ताब्यात घेतली. कारण अब्दुल करीमने इंग्रजांकडून एक कर्ज काढले होते ते वसूल करण्यासाठी खानाच्या एका जहाजावरील माल इंग्रजांनी उतरून घेतला. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध झाला. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य थेट पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहचले. दौरोजी नावाच्या मराठा अधिकाऱ्याने जानेवारी १६६०मध्ये राजापूरवर हल्ला केला आणि खानाच्या जहाजांची मागणी केली. परंतु इंग्रजांना जहाजे देण्याची टाळाटाळ तर केलीच पण जहाजावरील सुरक्षा सैनिकांना मराठ्यांविरुद्ध लढा देण्यास चिथावले. इंग्रजांचे हे वर्तन मराठ्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी गिफर्ड नावाच्या अधिकाऱ्यास आणि त्याचा हस्तक बाबाजी यास कैद केले. पुढे बाबाजीस सोडून दिले. परंतु गिफर्ड मात्र जवळजवळ एक महिना मराठ्यांच्या कैदेत होता. हे वखारवाले धूर्त असून बेमानीने वागतात याचा अनुभव पहिल्या संघर्षात मराठ्यांना आला. रेव्हिंग्टनचा आगाऊपणा १६६० च्या पूर्वार्धात शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढ्यात अडकले होते. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला जेव्हा वेढा दिला, तेव्हा विजापूर दरबाराने राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांना जौहर यास दारूगोळा पुरविण्यासाठी विनंती केली होती तेव्हा वखारीचा अधिकारी रेव्हिंग्टन हा स्वतः तोफा आणि दारूगोळा घेऊन जौहरच्या मदतीसाठी पन्हाळापर्यंत आला होता. स्वतः वेढ्यामध्ये सामील होऊन रेव्हिंग्टनने दारूगोळा कसा उडवावा याचे प्रात्यक्षिक जौहरच्या सैनिकांना दाखविले. या साऱ्या घटनांची माहिती शिवाजी महाराजांना मिळत होती. तेव्हा सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९९