भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 108, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 108

अनेक सूचना केल्या होत्या. त्यापैकी एक सूचना म्हणजे सिद्दींना आम्ही मदत करणार नाही असे शिवाजीला आश्वासन द्यायचे. लाकूडफाटा आणि मीठ याच्या व्यापारामध्ये सवलती देण्याची शिवाजीला विनंती करावी. शिवाय शिवाजीला देण्यासाठी मोठा नजराणाही थॉमस निकल्स याचेबरोबर देण्यात आला. १९ मे १६७३ रोजी निकल्स मुंबईहून निघाला आणि २३ मे रोजी रायगडला पोहचला. रायगडचे वर्णन त्याने लिहून ठेवलेले आढळते. 'जर अन्नधान्य व दारूगोळा यांचा सतत पुरवठा झाला तर हा किल्ला साऱ्या जगाविरुद्ध लढू शकेल' असे त्याने लिहून ठेवले आहे. ३ जून १६७३ रोजी शिवाजी महाराज आणि निकल्स यांची भेट झाली. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कोणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. निकल्स परत गेल्यावर शिवाजीने भिमाजी पंडित नावाचा आपला वकील मुंबईकर इंग्रजांकडे पाठविला. इंग्रजांशी बोलणी करून परत येतांना नारायण शेणवी नावाच्या इंग्रजांच्या हस्तकाला घेऊन तो रायगडला परतला. या वाटाघाटीतून १०,००० होन नुकसानभरपाई इंग्रजांना देण्याचे शिवाजी महाराजांनी मान्य केले. त्यामुळे इंग्रज व शिवाजी यांच्यातील तणावाचे संबंध संपले. हेन्री ऑक्झिंडेन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक करून घेण्याचे ठरविले.तेव्हा या प्रसंगी मोठा नजराणा घेऊन इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर आला. राज्यभिषेक झाल्यावर शिवाजीशी तह करून आणखी काही सवलती मिळवाव्यात असा इंग्रजांचा हेतू होता. हेन्री ऑक्झिंडेनने आपल्या रोजनिशीत राज्यभिषेकाचे तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. राज्यभिषेक सोहळा झाल्यावर हेन्री ऑक्झिंडेन महाराजांना भेटला. राजापूरला पुन्हा वखार उघडण्याची परवानगी त्याने महाराजांकडून मिळवली. त्याचप्रमाणे व्यापारामध्येही काही सवलती मिळविल्या. अशाप्रकारे हेन्री ऑक्झिंडेन शिष्टाई बऱ्याच प्रमाणात सफल झाली.त्या शिष्टाईनंतर १६७५ मध्ये इंग्रजांनी राजापूरला नव्याने वखार उघडली. त्यानंतर शिवाजी महाराज स्वतः राजापूरला गेले असतांना तेथील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि दोनशे होन नजराणा दिला. १०२ छत्रपती शिवाजी महाराज