भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 109, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 109

धरणगावची लूट हेनरी ऑक्सिंडेन शिवाजी महाराजांना भेटल्यापासून काही दिवस इंग्रज आणि शिवाजी यांचे संबंध मित्रत्वाचे राहिले. परंतु हा सलोखा फार काळ टिकू शकला नाही. १६७४ च्या डिसेंबर महिन्यात मुघलांच्या वर्चस्वाखाली असलेल्या खानदेश सुभ्यात मराठ्यांनी आक्रमण केले आणि हे आक्रमण चालू असतांना धरणगाव येथील इंग्रजांची वखार मराठ्यांनी लुटली. त्यावेळी सॅम्युअल ऑस्टिन हा धरणगावच्या वखारीचा प्रमुख होता. तो वखारलुटीनंतर मुंबईला गेला. तेथील अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून नुकसान भरपाई मागण्यासाठी सप्टेंबर १६७५ मध्ये तो रायगडावर आला. प्रत्यक्ष भेटीमध्ये वखारीच्या लुटीबद्दल आपणास काहीच माहिती नाही म्हणून शिवाजी महाराजांनी नुकसान भरपाई देणे अमान्य केले. निदान यापुढे तरी इंग्रजांच्या वखारींना संरक्षण मिळावे म्हणून ऑस्टिनने शिवाजीकडे याचना केली. नुकसान भरपाईचे बाबतीत शिवाजी महाराजांनी ताठर धोरण स्वीकारलेले आढळते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक तोफा आणि बंदुका महाराजांना इंग्रजांकडून हव्या होत्या. परंतु त्याबाबत इंग्रजांनी नेहमीच टाळाटाळ केली. तेव्हा इंग्रज वरकरणी फक्त गोड वागतात याची शिवाजी महाराजांना खात्री पटली होती. शिवाय आपले कट्टर शत्रू सिद्दी यांना इंग्रज मदत करीत होते याचा अनुभव महाराजांना आलेला होता. सिद्दींच्या गलबतांना मुंबईकर इंग्रज आश्रय देतात हे महाराजांना माहिती होते, म्हणून इंग्रजांशी तह करतांना कोणत्याही मोठ्या सवलती देण्याचे शिवाजी महाराजांनी टाळले. जेव्हा दंडाराजपुरीवर मराठ्यांनी हल्ले केले तेव्हा सिद्दींना इंग्रजांनी आश्रय दिला. त्यामुळे शिवाजी महाराज इंग्रजांविषयी सावध झाले. सिद्दींच्या अगोदर इंग्रजांचाच बंदोबस्त केला पाहिजे असा निश्चय शिवाजी महाराजांनी केला. त्यादृष्टीने मुंबई बंदराजवळ असलेल्या खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. खांदेरीची लढाई खांदेरीला शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मायनाक भंडारी यांच्या देखरेखीखाली तटबंदी बांधण्याचे काम मराठ्यांनी सुरू केले. खांदेरीला जर मराठ्यांनी तटबंदी बांधली तर मुंबईचे आपले केंद्र धोक्यामध्ये येईल असे इंग्रजांना वाटू लागले. तेव्हा बांधकामाला साहित्य मिळू नये म्हणून इंग्रजांनी मराठ्यांची रसद तोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मराठे व इंग्रज यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. इंग्रजांनी सप्टेंबर १६७५ मध्ये खांदेरी बेटावर तोफांचा सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०३