भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 117, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 117

प्रांताची विभागणी महालात करण्यात आली होती. महालावरील अधिकाऱ्याला हवालदार म्हणत. महालाची विभागणी परगण्यात करण्यात आली होती. परगण्याचे अधिकारी म्हणजे देशमुख आणि देशपांडे. खेडे हा शेवटचा घटक होता. त्याचे अधिकारी म्हणजे पाटील आणि कुलकर्णी. खेड्याच्या अधिकाऱ्यापासून ते प्रांतांच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची जबाबदारी महसूल वसुलीची होती. त्याशिवाय आपल्या विभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, किल्ल्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणे आणि आपआपल्या घटकापुरते न्यायनिवाड्याचे काम करणे इ. कामे संबंधीत प्रधानांच्या आणि राजाच्या आदेशाप्रमाणे करावी लागत असत. सुभेदाराने आपआपल्या प्रांतातील. रयतेची सर्वप्रकारची काळजी घेतली पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. नवा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाल्यावर त्या प्रदेशातील रयतेची सर्वप्रकारची सोय करावी, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात अशा आज्ञा सुभेदाराला केलेल्या असत. शिवाजी महाराजांचे प्रशासन कल्याणकारी राज्याच्या स्वरूपाचे होते. त्यांनी वेगवेगळ्या सुभेदारांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. या पत्रांमधून रयतेविषयी महाराजांचीं किती तळमळ होती हे स्पष्ट होते. रयतेला काडीचा जरी उपद्रव झाला तरी महाराज तो सहन करणार नाही असा इशारा महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेल्या एका पत्रामध्ये आढळतो. स्वराज्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या प्रदेशाबाबत सभासद लिहितो की, 'नवी रयत येईल त्यास गुरेढोरे द्यावी. बीजासाठी दाणापैका द्यावा.' एका पत्रात महाराजांनी सुभेदारांना म्हटले आहे की, 'ज्याला शेत करावयाची कुवत आहे पण ज्याच्याकडे बैल, नांगर, बी- बियाणे नाही, त्यांना सर्व साहित्य पुरवावे. गरीब शेतकऱ्यांना दिलेले कर्ज त्यांच्या सवडीप्रमाणे वसूल करावे, त्यासाठी कोणतीही बळजबरी करू नये. शिवाजी महाराजांचे हे धोरण पाहिल्यास महाराज हे मध्ययुगीन कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक होते असे म्हणता येईल. वतनदारी यादव कालापासून महाराष्ट्रात वतनदारांची परंपरा निर्माण झाली होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी या वतनदारी पद्धतीची जोपासना केली. हे वतनदार राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी प्रजेचा छळ करीत असत. बहमनी काळात वतनदारांनी महसूल गोळा करण्यासाठी रयतेवर किती निष्ठूरपणे अत्याचार केले हे तत्कालीन कागदपत्रावरून दिसते. त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या काव्यामधूनही ते चित्र स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना रयतेचा छळ करणाऱ्या शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १११