भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 44, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 44

अधिकारीही भयभीत झाले. मुघल प्रदेशात दहशत निर्माण करण्याचा शिवाजीचा हेतू तडीस गेला. ५ फेब्रुवारी १६६४ रोजी शिवाजी रायगडावर परतला. कर्नाटकात शहाजीचा हुद्देगिरी येथे घोड्यावरून पडल्यामुळे २३ जानेवारी १६६४ रोजी मृत्यू झाला होता. शिवाजी रायगडावर पोहचला त्यावेळी राजमाता जिजाबाई सती जाण्याच्या तयारीत होती. परंतु शिवाजीने सती जाण्यापासून राजमातेला परावृत्त केले. खवासखानाचा बंदोबस्त शिवाजीचे मुघलांबरोबर संघर्ष चालू असताना आदिलशाही सरदारांनी कोकण भागात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सरदारांना मुघलांची फूस होती. कुडाळच्या लखम सावंताला शिवाजीवर सूड उगवून आपले राज्य ताब्यात घ्यावयाचे होते. लहान मोठ्या चकमकी घडू लागल्या. प्रथम बचावात्मक भूमिका घेऊन मराठ्यांनी लखम सावंतशी तह केला आणि कुडाळची सत्ता त्याला दिली. विजापूरकरांनी केवळ मुघलांना खूष करण्यासाठी कोकणातल्या चढाईचा देखावा केला होता परंतु शिवाजीबरोबर लढण्याची विजापूर दरबारची मनापासून इच्छाच नव्हती. पण अचानकपणे १६६४ मध्ये विजापूरकरांच्या धोरणात बदल झाला. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी खवासखान नावाच्या सरदाराची विजापूरकरांनी नेमणूक केली. त्याच्या समवेत बाजी घोरपडे, लखम सावंत, खेम सावंत हे मराठे सरदारही मोठ्या तयारीनिशी निघाले. खवासखानाबरोबर बाजी घोरपडे येत आहे हे समजताच शिवाजीचा संताप अनावर झाला. याच बाजी घोरपड्याने शहाजीला बेड्या घालून विजापूर दरबारात हजर केले होते. शिवाय लखम सावंतने पुन्हा दगा दिला याचीही शिवाजीला चीड आली होती. ऑक्टोबर १६६४ मध्ये स्वतः कोकणची स्वारी काढून शिवाजीने वेंगुर्ला आणि कुडाळ या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर थेट मुधोळपर्यंत धडक मारली. बाजी घोरपड्याबरोबर निकराचे युद्ध केले. त्या युद्धात बाजी मारला गेला. त्याचा मुलगा मालोजी शिवाजीला शरण आला. मुधोळचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाला. या गोष्टीचा राग येऊन खवासखानाने प्रचंड तयारीनिशी शिवाजीवर स्वारी केली. परंतु मराठ्यांनी आदिलशाही फौजेची एवढी दाणादाण उडवली की खवासखानाला पळून जावे लागले. त्यानंतर फोंड्यापर्यंत स्वारी करून खेम सावंताला ही शिवाजीने चांगला धडा शिकविला. शिवाजी फोंड्यापर्यंत आलेला पाहून पोर्तुगीजांनी आपल्या बचावासाठी नजराणा पाठवून शिवाजीशी स्नेह जोडला. ३८ छत्रपती शिवाजी महाराज