भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 45, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 45

शिवाजीची पहिली आरमारी स्वारी आदिलशहा आणि मुघल यांच्याबरोबर सतत लढाया चालू असताना शिवाजीने आपले आरमारी सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष दिले होते. एखादी आरमारी स्वारी काढून समुद्रातील आपल्या शत्रूंना भयचकीत करावे आणि आपल्या आरमारी सामर्थ्याची चुणूक दाखवावी अशी शिवाजीची इच्छा होती. आदिलशाही सरदारांचा बंदोबस्त केल्यानंतर ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ८५ जहाजे आणि ३ मोठी गलबते घेऊन शिवाजीने आपली पहिली आरमारी स्वारी काढली. शिवाजीच्या स्वारीला पोर्तुगिनांकडून कोणताही अडथळा आला नाही. मालवणहून त्याने मोहिम सुरू केली ते थेट कर्नाटकातील बसनूर या बंदरापर्यंत शिवाजीने मजल मारली. बसनूरला पोहचल्यावर ते बंदर मराठ्यांनी यथेच्छ लुटले. बसनूर नंतर गोकर्ण अंकोला या मार्गाने शिवाजी स्वराज्याकडे परतला. शिवाजीच्या या आरमारी स्वारीने पश्चिम किनाऱ्यावरही शिवाजीचे वर्चस्व वाढू लागले. सिद्दी,इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज या सर्वांनाच शिवाजीचे भय वाटू लागले. थोडक्यात १६६५ हे कोकण विजयाचे आणि किनारपट्टीच्या विजयाचे वर्ष ठरले. तिकडे दिल्लीत औरंगजेब बादशहा अतिशय अस्वस्थ झाला होता. शायिस्तेखानाप्रमाणे जसवंतसिंग पराभूत होऊन परतला होता. तेव्हा शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने मिर्झाराजे जयसिंग याला प्रचंड फौज देऊन दक्षिणेत पाठविण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला. 🔲🔲🔲 बलाढ्य शत्रूवर मात ३९