भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 59, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 59

शिवाजी २७ सफर (१९ ऑगस्ट) रोजी मुलासह पळून गेला.' मुस्तैदखान हा औरंगजेबाचा दरबारी लेखक असल्यामुळे त्याचे विधान विचारात घेणे आवश्यक आहे. आणखी एक समकालीन पाश्चात्य प्रवासी बर्निअर याने लिहून ठेवले आहे की 'शिवाजीच्या पलायनामागे खुद्द औरंगजेबाचाच हात होता.' शिवाजीच्या सुटका नाट्याची मिमांसा करताना या विधानाचाही विचार करणे आवश्यक आहे. शिवाजीची आग्रा भेट आणि सुटका समजावून घेण्यासाठी आणखी महत्त्वाच्या साधनाचा विचार करावा लागतो. ते साधन म्हणजे राजस्थानी भाषेतील समकालीन पत्रे. या पत्रांमधून शिवाजी उत्तरेत आल्यापासून आग्राला जाईपर्यंत त्याच्या विषयीचे अनेक उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीची सुटका झाल्यानंतरचेही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. २३ ऑगस्ट १६६६च्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की 'रात्र एक दिड घटका राहिली असता पहारेकऱ्याने शिवाजीस पाहिले होते. परंतु नंतर अचानकपणे तो कसा निसटला हे त्याला समजले नाही.' ३ सप्टेंबरच्या पत्रात असा उल्लेख आहे की '४ घटिका दिवस वर आला तेव्हा शिवाजी निसटल्याचे समजले' या दोन्ही पत्रांचा अर्थ असा की शिवाजी पहाटेच्या अंधारात पहारा शिथिल असताना निसटून गेला असावा. म्हणजेच पहारेकरी बेसावध असतानाच शिवाजी संभाजीसह निसटला असला पाहिजे. कदाचित पहारेकऱ्यांनाच त्याने वश करून घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहारेकऱ्यांना वश करून आणि अगोदरच जमवून ठेवलेले परवाने उपयोगात आणून शिवाजीने सुटका करून घेतली असावी असे म्हणता येईल. शिवाजी पेटाऱ्यातून निसटला हा निष्कर्ष खुद्द बादशहानेच काढला असावा हे ३ सप्टेंबरच्या राजस्थानी पत्रावरून दिसून येते. औरंगजेबाचा संताप शिवाजी एवढ्या मोठ्या कडक पहाऱ्यातून एकाएकी नाहिसा झाल्याचे वर्तमान पहाराप्रमुख फुलादखान याचेकडून औरंगजेबाला समजले. तेव्हा औरंगजेब अत्यंत संतप्त झाला. फुलादखानाने औरंगजेबास सांगितले की 'आम्ही वरचेवर कोठडीत जाऊन पहात होतो पण एकाएकी गहजब झाला. शिवाजी गायब जाहला. पळाला, की जमिनीत घुसला, की आसमानामध्ये गेला हे काहीच कळले नाही. देखत देखत नाहिसा झाला. काय हुन्नर जाहला न कळे.' हे सर्व ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली त्याने ताबडतोब शिवाजी आणि औरंगजेब ५३