भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 60, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 60

शिवाजीचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अडीच लाख स्वार पाठविले. सभासदाने दिलेली माहिती कदाचित अतिशयोक्तीची असली तरी शिवाजीचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठविली ही गोष्ट मात्र खरी. शिवाजी कैदेतून पळाला म्हणून औरंगजेबाने रामसिंगास जबाबदार धरले. त्याला बोलावून त्याचा पाणउतारा केला आणि त्याची मनसब एकदम कमी केली. शिवाजीबरोबर आलेल्या मराठ्यांपैकी जे लोक अद्याप परत गेले नव्हते आणि आग्रा किंवा जवळपास मुक्कामाला होते त्यांची त्वरेने धरपकड करण्यात आली. त्यामध्ये रघुनाथपंत कोरडे, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि कवींद्र परमानंद ह्यांचा समावेश होता. जवळजवळ ८ महिने ही मंडळी औरंगजेबाच्या कैदेमध्ये होती. पुढे एप्रिल १६६७ मध्ये या साऱ्यांची सुटका करण्यात आली. शिवाजी राजगडाकडे परत शिवाजीला शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा शिवाजी वेषांतर करून हुलकावण्या देत असावा. कारण कोणत्याही तुकडीला त्याला शोधून काढता आले नाही. संभाजीबरोबर असल्यामुळे शिवाजीला त्याची काळजी वाटत होती. एक तर तो वयाने लहान होता. तो बरोबर असल्यामुळे शिवाजीचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजीने असा विचार केला की संभाजीला मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजीचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजीला करून शिवाजीने निर्धास्तपणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला. शिवाजी कोणत्या मार्गाने राजगडला परत आला याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजीने स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा- वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजी राजगडाकडे परतला असावा. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजी ज्या मार्गाने आग्र्याला गेला त्याच मार्गाने राजगडाकडे परतला कारण आग्राहून निसटल्यावर तो नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्र्याला जाताना तो राजगड-औरंगाबाद-हंडिया- भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-धोलपूर-आग्र्याया मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेला होता. बहुधा त्याच मार्गाने तो राजगडाकडे परत आला असावा १२ ५४ छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास) · पृष्ठ 60, कुल 127 में से · BharatKosha