भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 62, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 62

८. चढाईचे राजकारण आग्याहून परत आल्यावर शिवाजी आग्याहून परत राजगडला आल्याचे वर्तमान नोव्हेंबर १६६६च्या अखेरीस सर्वत्र पसरले. शिवाजीच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली. विजापूर दरबारात मोठी खळबळ माजली. वखारवाले इंग्रजांचे धाबे दणाणले. शिवाजीच्या सुटकेचा सर्वात मोठा धक्का दक्षिणेत असलेल्या मिर्झाराजे जयसिंगाला बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की तो आजारी पडला आणि त्यातच २८ ऑगस्ट १६६७ रोजी बन्हाणपूर येथे त्याचा मृत्यू झाला. बन्हाणपूर येथे तापी नदीचे काठी मिर्झाराजे जयसिंग यांची भव्य समाधी बांधलेली आजही दिसते. शिवाजी आग्याला अडकून पडला असताना त्याचे लहानसहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटला हे समजल्यावर त्याच्या बहुतेक शत्रूंनी आपले धोरण बदलले. सप्टेंबर १६६६ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तुमजमा याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. त्याने बहलोलखान या सरदाराला मराठ्यांविरुद्ध पाठविण्याचे ठरविले. शिवाजीचा सावत्रभाऊ व्यंकोजी राजे बहलोलखानच्या मदतीला धावून आला आणि त्या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जबरदस्त प्रतिकारामुळे त्यांना यश आले नाही. मराठे आपल्याला दाद देत नाहीत, आणि आता तर प्रत्यक्ष शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आला आहे, हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून शिवाजीशी सलोखा करण्याचे ठरविले. दरसाल दोन लाख होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने शिवाजीशी तह केला. कुतुबशहा हा तर प्रथमपासून सावध होता. शिवाजीशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून शिवाजीशी मैत्रीचा तह केला आणि दरसाल पाच लाख होन खंडणी देण्याचे कबुल केले. यावरून आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीचा दरारा केवढा निर्माण झाला होता याची कल्पना येते. आदिलशहा आणि ५६