छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 64, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंहोते. आग्र्याहून शिवाजी सुखरूप परत आल्यानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी गोवेकरांनी एक खास वकीलही पाठविला होता. परंतु अंतःस्थपणे पोर्तुगिजांच्या शिवाजीविरुद्ध कारवाया चालू होत्या. पोर्तुगीजांच्या कारवाया शिवाजीने आरमारी सामर्थ्य वाढविल्यामुळे पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी संशय वाटू लागला होता. विशेषतः शिवाजीने सुरत लुटल्यानंतर पोर्तुगिजांना अधिक काळजी वाटू लागली होती. सुरतेची लूट स्वराज्यात आणताना शिवाजीला पोर्तुगिजांनी मदत केली होती, असा निष्कर्ष पोर्तुगीज दप्तरातील पत्रव्यवहारावरून निघतो. शिवाजीच्या सामर्थ्याला पोर्तुगीज वचकून होते. पण त्याचबरोबर शिवाजीची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याची भीतीही त्यांना वाटत होती. म्हणूनच वरकरणी पोर्तुगिजांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि, शिवाजीच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे हे दुटप्पी वर्तन शिवाजी ओळखून होता. कुडाळचे देसाई शिवाजीला विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते. वास्तविक पाहाता कुडाळचा लखम सावंत याचा पराभव करून शिवाजीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता. त्याने शिवाजीबरोबर तह करून अभयदान मिळविले होते. परंतु शिवाजी आग्र्याकडे गेल्यानंतर लखम सावंताने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या. विशेषतः पोर्तुगिजांची फूस असल्यामुळे लखम सावंत शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास उद्युक्त झाला. आग्र्याहून परतल्यानंतर लखम सावंतचे उद्योग आणि पोर्तुगिजांच्या कारवाया शिवाजीच्या लक्षात आल्या. तेव्हा लखम सावंतला धडा शिकविण्यापेक्षा पोर्तुगिजांनाच धडा शिकवावा असे शिवाजीने ठरविले. त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७च्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून शिवाजीने पोर्तुगिजांना नामोहरम केले. शिवाजीचा प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आणि प्रतिकार जर केला तर शिवाजी थेट गोव्यापर्यंत येऊ शकेल अशी भीती पोर्तुगिजांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी शिवाजीबरोबर तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंताला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा आणि कुतुबशहानंतर पोर्तुगिजांनीही शिवाजीचे श्रेष्ठत्व मान्य केले. मुअज्जमची भूमिका दक्षिणेचा मुघल सुभेदार म्हणून शाहजादा मुअज्जम मे १६६७ मध्ये ५८ छत्रपती शिवाजी महाराज