भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 65, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 65

औरंगाबादला रुजू झाला. आग्र्याहून सुटका करून शिवाजी दक्षिणेत परत आल्यावर मुघलांच्या राजकारणात फरक घडून येऊ लागला. शिवाजी आता निसटलाच आहे, तेव्हा ह्याच्याशी वैर करण्यापेक्षा शक्यतो समझोता करावा असे खुद्द औरंगजेबाला वाटू लागले होते. विशेषतः मिर्झाराजे जयसिंग मृत्यू पावल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे करून चालणार नाही असे वाटू लागले. शाहजादा मुअज्जम हा स्वतः ऐषआरामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीशी लढा देण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे असे त्याचे मत होते. शिवाय संभाजीला मनसबीच्या जाळ्यात पकडून काही कूरघोडी करता येईल का या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. संभाजीला पुन्हा मनसब द्यावी म्हणून त्याने औरंगजेबाचीही परवानगी मिळवली आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७ मध्ये संभाजीला औरंगाबादेला बोलाविले मुअज्जमने समारंभपूर्वक संभाजीला मनसबदारी बहाल केली. संभाजी वयाने लहान असल्यामुळे त्याच्यातर्फे मन्सबीची जबाबदारी निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर यांनी सांभाळावी असेही ठरले. अशा प्रकारे मराठ्यांशी सख्य जोडण्याचा उपक्रम मुअज्जमने सुरू केला होता. परंतु दिल्लीत औरंगजेबाला मुअज्जमच्याच हेतूविषयी शंका वाटू लागली. मराठ्यांच्या मायाजालात मुअज्जम जर फसला तर दक्षिणेतील राजकारणाचा धागा तुटून जाईल अशी भीती औरंगजेबाला वाटू लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी निघून गेल्यामुळे तो अत्यंत बेचैन झाला होता. सूड म्हणून हिंदू जमातीवर जिझिया कर बसविण्याचे त्याने ठरविले. वास्तविक पाहाता हा जाचक कर अकबराने विचारपूर्वक बंद केला होता. परंतु औरंगजेबाने मात्र हेतुपुरस्सर हिंदूंवर जिझिया कर बसविला. शिवाजी त्यामुळे उद्विग्न होईल अशी औरंगजेबाची अपेक्षा होती. गरीब सामान्य हिंदू रयतेवरती हा जुलमी कर बादशहाने बसविला ही गोष्ट शिवाजीच्या मनाला क्लेशदायक वाटली. त्याने औरंगजेबाला लिहिलेले फारसी भाषेतील एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रावरून शिवाजीच्या उदार धार्मिक धोरणाविषयी आणि त्याच्या थोरपणाविषयी कल्पना येते. त्याने या पत्रात उल्लेख केला आहे की, ‘हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही परमेश्वराची लेकरे आहेत. मंदिरामध्ये हिंदू घंटानाद करतात, तर मशिदीमध्ये मुसलमान ईश्वराला बांग देतात. सृष्टी हे परमेश्वराने निर्माण केलेले एक सुंदर चित्र आहे.’ अशा आशयाचा मजकूर लिहून शिवाजीने औरंगजेबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मात्र आपली भूमिका अधिक ताठर करून सुरतेच्या हिंदू व्यापाऱ्यांवर अधिक जकात बसविली. हिंदूंना डिवचण्यासाठी १६६९च्या सुमारास काशी येथील चढाईचे राजकारण ५९