भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 66, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 66

देवालय औरंगजेबाने पाडले. आणि त्या ठिकाणी मशीद उभारली. अशा प्रकारच्या औरंगजेबांच्या ताठर धोरणामुळे उत्तर भारतात सर्वसामान्य हिंदूंमध्ये अस्वस्थता पसरली. सुरतेमधील जवळ जवळ ८००० हिंदू बादशहाकडे दाद मागण्यासाठी दिल्लीकडे गेले, असा उल्लेख एका समकालीन पत्रामध्ये आढळतो. दक्षिणेत दहशत निर्माण करण्यासाठी औरंगजेबाने मुअज्जमला असे कळविले की, प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी या दोघांनाही कैद करावे. मुअज्जमला मात्र बादशहाच्या या घातकी धोरणाबद्दल चीड आली होती. त्याने कोणालाही कैद वगैरे केले नाही. उलट मराठ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या प्रदेशात जाऊ दिले. वास्तविक पाहता शिवाजीची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर सलोख्याचे राजकारण जर औरंगजेबाने केले असते तर शिवाजीनेही मुघलांबाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारले असते. संभाजीला मन्सब घेण्यासाठी पाठवून शिवाजीने आपले सामोपचाराचे धोरण स्पष्ट केले होते. औरंगजेबाने हिंदूवर जिझियाकर लादलेला ऐकून एक सविस्तर पत्र पाठवून सामान्य रयतेची छळवणूक करू नये अशी तळमळीची विनंती शिवाजीने बादशहाला केली होती. परंतु संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा औरंगजेबाने रचलेला होता आणि म्हणून शिवाजीच्या सामोपचाराच्या धोरणाला त्याने दाद दिली नाही. शिवाजीची आक्रमक भूमिका औरंगजेबाने सामोपचाराचे धोरण सोडून देऊन आपल्याविरुद्ध छुपे राजकारण सुरू केले, आपले निष्ठावंत सरदार निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचला हे पाहून शिवाजीनेही मुघलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले आणि केवळ घाटावर व कोकणातच नव्हे तर बागलाण, खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवाजीने योजना आखली. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे प्रवेशद्वारच होते. तेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजीने ठरविले आणि त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजीने तानाजी मालुसरे याला पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजीला वीरमरण पत्करावे लागले. पुण्याजवळ घाटमाथ्याच्या तोंडाशी असलेला दुसरा ६० छत्रपती शिवाजी महाराज