भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 75, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 75

बहलोल खानाची स्वारी विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर शिवाजीने आक्रमक भूमिका घेतली. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजीने पाठविले. मोठ्या हिकमतीने कोंडाजी फर्जंदने ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. या स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या 'पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. खवासखानाने बहलोलखान नावाच्या सरदारास मोठ्या तयारीनिशी शिवाजीविरुद्ध पाठविले. मुघल सरदार दिलेरखान याची मदत बहलोल खानाला मिळावी म्हणून खवासखानाने प्रयत्न सुरू केले. बहलोल खानची स्वारी येत आहे हे समजल्यावर शिवाजीने प्रतापरावाला बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले आणि त्याला निर्वाणीची आज्ञा केली की, 'बहलोलखान स्वराज्यामध्ये उपद्व्याप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा निर्णायक पराभव करावा. आणि त्याला ठार मारून कायमचा बंदोबस्त करावा. शिवाजी महाराजांचा हा निर्वाणीचा इशारा मिळाल्यावर प्रतापराव गुजर आणि आनंदराव मोठ्या तयारीनिशी विजापूरी प्रदेशात घुसले. एप्रिल १६७३ मध्ये प्रतापरावाने बहलोलखानास उमराणीजवळ गाठले. याठिकाणी घनघोर युद्ध होऊन बहलोल खानाचा दणदणीत पराभव झाला. खान पकडला गेला. त्याने प्रतापरावची मनधरणी करून क्षमा मागितली. 'या उपरी त्रास देणार नाही, आम्ही तुमचे आहोत' अशा शब्दात खानाने विनविण्या केल्या. उदार अंतःकरणाच्या प्रतापराव गुजरने बहलोल खनाला सोडून दिले. ही गोष्ट समजताच शिवाजी संतप्त झाला. तुम्ही खानाला का सोडून दिले? म्हणून प्रतापरावाला दोष दिला. खानाचा पराभव केल्यानंतर प्रतापरावाने हुबळीपर्यंत मजल मारून इंग्रजांची वखार लुटली. प्रतापरावाचे कर्नाटकात पराक्रम चालू असतांना देशावरचे मोक्याच्या ठिकाणचे किल्ले घेण्याचे सत्र मराठ्यांनी सुरूच ठेवले होते. १६७३ च्या पावसाळ्यापर्यंत परळी आणि सातारा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. मराठ्यांचे हे सारे पराक्रम ऐकून आदिलशहाचा सुत्रधार खवासखान अतिशय संतप्त झाला. बहलोल खानाची त्याने निर्भत्सना केली. तेव्हा पन्हाळा जिंकून घेण्याचा निर्धार बहलोल खानाने केला. त्यासाठी त्याने कोल्हापूरजवळ छावणी केली. ही बातमी समजताच शिवाजीने प्रतापरावाला मुघलांची पिछेहाट ६९