भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 186, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 186

६ वा. ] अनिर्वाच्यनिरूपण. १५१ ॥ ९ ॥ सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळाया गूळ देणें । ऐसें हें सद्गुरू- विणें । होणार नाहीं ॥ १० ॥ सद्गुरुकृपा वळे त्यासी । जो शोधील आप- णाशीं । पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११ ॥ दृढ करूनियां बुद्धी । आधीं घ्यावी आपली शुद्धी । तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२ ॥ आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली ती मायिक वार्ता । पुढें वस्तुच तत्वता । समाधान ॥ १३ ॥ आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं । जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४ ॥ सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसा- क्षिणी ते अवस्था । आत्मा त्याहून परता । अवस्थोतीत ॥ १५ ॥ पदार्थ- ज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणे नुरे । ते समयीं फुंजें उतरे । मीपणाचा ॥ १६ ॥ जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण । अनिर्वाच्य समाधा- न । या कारणें बोलिजे ॥ १७ ॥ अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि फोल । शब्दा सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८ ॥ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ । शब्द सांगे यथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९ ॥ शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे । शब्द फोल अर्थ असे । घनदाटपणें ॥ २० ॥ भुसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊ- न भूस टाकिजे । तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१ ॥ पोंचटां- मध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट । तैसा शब्द हा फलगट । परब्रह्मीं ॥ २२ ॥ शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वीच आहे । या कारणें न साहे । उपमा तया अर्थांसी ॥ २३ ॥ भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्य- जावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४ ॥ दृश्य वेगळें बोलि- जे । त्यास वाच्यांश म्हणिजे । त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५ ॥ ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला न वचे ॥ २६ ॥ जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभ- वाचा गाभा । ऐसा तोहि उभा । कल्पित केला ॥ २७ ॥ मिथ्या कल्पने- पासून झाला । खरेपण कैसें असेल त्याला । म्हणोनि तेथें अनुभवाला । ठा-

१. जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या (केवल साक्षित्व) या चार अवस्थांहून भिन्न. २. अभिमान. ३. ब्रह्मानुभवाचे वेळीं 'मी' ही स्फूर्तिच नसल्यामुळे तो अनुभव कोण सांगणार ? अर्थात् तें समाधान अनिर्वाच्य होय. ४. आंतबाहेर.