भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 21, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 21

१८ उपोद्घात. दासबोधांतील कलिधर्मनिरूपणांत व इतर काव्यांत जागोजाग चितारिलें आहेच. (समर्थांची स्फुट कविता, रामदासी ग्रंथमाला खंड ३ पहा.) महाराष्ट्रांत त्या वेळीं असलेली राज्यसंस्था यवनांच्या ताब्यांत होती. अर्थात् आमचा धर्म व तत्प्रणीत नीति यांच्या स्थापनेस व अभिवृद्धीस ह्या राज्यसंस्थेचा कांहींएक उप- योग होण्यासारखा नव्हता; इतकेंच नव्हे, तर उलट त्यांचा ऱ्हास करण्यास ती कारणीभूत झालेली होती. अर्थात्‌च ती पूर्णपणें मोडून टाकून त्या ठिकाणीं ह्या धर्मास व नीतीस पाठिंबा देणारी आणि तेणेंकरून मोक्षसाधनाचा मार्ग सुकर करणारी अशी स्वदेशी राज्यसंस्था स्थापन करणें अवश्य झालेलें होतें. ही विशिष्ट परिस्थिति लक्षांत घेऊनच समर्थांनीं/ 'राजकारण' हें आपल्या सांप्रदायाचें दुसरें अंग बनविलें, व तद्विषयक शिकवणीचा दासबोधांत समावेश केला. तात्पर्य, राजकारण ऊर्फ राज्यस्थापना हें साधन म्हणून समर्थांनीं योजिलें. साध्य व साधन यांत मोठा भेद आहे, आणि तो लक्षांत न आल्यास मोठमोठे प्रमाद घडून येण्याचा संभव असतो, हें लक्षांत घेणें जरूर आहे. धर्म व नीति यांचा उपदेश करण्याचें काम समर्थकालीन अनेक संतांनीं केलें होतें; परंतु त्या- पासून फारसें कांहीं कार्य झालें नाहीं. समाजांत मुमुक्षेचा उदय होण्यास हा उप- देश थोडा फार उपयोगीं पडला असेल, नाहीं असें नाहीं; परंतु यवनराज्यामुळे उत्पन्न झालेल्या विपरीत स्थितींत धर्माच्या व नीतीच्या बाबतींत सर्वत्र जी बज- बजपुरी व स्वैराचार यांचें प्राबल्य माजलें तें मोडण्याचें काम संतांच्या उपदेशानें 'झालें नाहीं व होण्यासारखेंहि नव्हतें. अज्ञ जनांच्या मनावर संतांच्या उपदेशाचा कांहीं तरी इष्ट परिणाम होण्याचा संभव होता; पण धर्म व नीति यांचा राजा- श्रय सुटला म्हणजे विद्वन्मन्य असा जो एक पढतमूर्खांचा वर्ग समाजांत असतो (याचें वर्णन दासबोधाच्या प्रारंभींच आहे), तो फार उच्छृंखल होऊन अनीति व अधर्म यांचा प्रसार करतो. त्याला वेसण घालण्याचें काम संतांसारख्या सद्हेतुप्रेरित पण पंगु उपदेशकांच्या हातून होत नाहीं. तें करण्याकरितां शासन- सामर्थ्याचें अधिष्ठान असणाऱ्या सामाजिक अथवा राजकीय संस्था स्थापाव्या लागतात व त्यांचेंहि यथान्याय रक्षण व्हावें म्हणून धर्म व नीति यांचा अभि- मान बाळगणारी राज्यसंस्था असावी लागते. ही गोष्ट लक्षांत घेऊनच सम- र्थांनी 'समुदाय' ऊर्फ संघटना करून धर्मस्थापना व राज्यस्थापना करण्याचा

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 21, कुल 467 में से · BharatKosha