दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 24, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंउन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥ तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्वब्रह्म म्हणोन बैसला । माहापापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । उल्हासवा विषयभोग । दोघे एकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला । त्याच्या बापेन न वचे मोडिला ॥ मुखामध्यें घास घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥ (द. १०-स. ४) ✕ ✕ ✕ ✕ ✕ ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्ट झाले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ (१४-७-३१) या उताऱ्यांत वर्णिलेल्या स्वजनांच्या स्वैर व भ्रष्ट वर्तनापासून माजलेली बजबजपुरी नष्ट झाल्यावांचून धर्मस्थापनेचें कार्य होणार नाहीं, असें समर्थांचें स्पष्ट मत होतें; व तदनुसार त्यांनीं आपल्या विवेकपूर्ण उपदेशानें व कृतीनें हें बंड मो