भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 31, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 31

२८ उपोद्घात. ( ८ ) झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे कीं फुकाची ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपाडावें । ( ११-५-९ ) ( १० ) उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेंच टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं । ( -१४-१ ) ( ११ ) नाना जनांचें हृदय । मृदु शब्दें उकलावें ॥ ( १२ ) वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये । तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ ( १३-१०-२६ ) ( १३ ) बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ ( १४ ) शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों नेदावें । कोणीयेकाचें ॥ ( १५ ) उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठायीं ठायीं ॥ कांहींएक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ हे उतारे अगदीं निवडक व त्रोटक आहेत. त्यांत बीजरूपानें जीं तत्त्वें सांगितलीं आहेत, त्यांचा विस्तार पहावयाचा असल्यास दासबोध ग्रंथ समग्र लक्षपूर्वक वाचावा. दासबोधाखेरीज समर्थांचे काव्यबद्ध असे आणखी कित्येक प्रबंध आहेत. त्यांपैकीं कांहीं प्रकाशित व कांहीं अप्रकाशित आहेत. अप्रकाशित प्रकरणांपैकीं बरीच प्रकरणें धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभेस उपलब्ध झालीं आहेत व त्यां- तील कांहीं तिनें एका स्वतंत्र खंडाच्या रूपानें प्रसिद्धहि केलीं आहेत. हीं सर्व प्रकरणें समर्थांनीं निरनिराळ्या प्रसंगीं लिहिलेलीं आहेत. त्यांतील मतलब सामा- न्यतः दासबोधांतील प्रमेयास पोषक आहे. किंबहुना, ह्या प्रमेयांचें विशेष व खुलासेवार स्पष्टीकरणच त्यांत आहे असें म्हटलें तरी चालेल. ह्या स्फुट- काव्याप्रमाणें समर्थांनीं एक रामायणहि रचिलें आहे. परंतु हें रामायण साग्र नाहीं. सीतेची बंधमुक्तता करून रावणाचा वध करण्याचा जो भाग मूळ रामायणांत आहे तोच समर्थांनीं आपल्या रामायणाचा मुख्य विषय बनविला