दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 32, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. २९
आहे. ही निवड करण्यांतहि त्यांचें औचित्य व राष्ट्रीय दृष्टि दिसून येते. तत्का- लीन महाराष्ट्राचें बंधन दूर करणें हें समर्थांचें उद्दिष्ट कार्य होतें. अर्थात् ह्या कार्यास पोषक असा जो सीताबंधविमोचनाचा प्रसंग तेवढाच निवडून घेऊन तो आपल्या भेदक वक्तृत्वानें तत्कालीन महाराष्ट्राच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न त्यांनीं करावा, हें त्यांच्या विचक्षणतेस व धूर्ततेस साजेसेंच आहे. ह्या एकाच गोष्टीवरून समर्थांची दृष्टि इतर संतांहून कशी निराळी म्हणजे राष्ट्रीय अशी होती हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. त्यांची इतर काव्यप्रकरणेंहि बहुधा याच दृष्टीनें लिहिलेलीं आहेत. त्यामुळे दासबोधाप्रमाणेंच तींहि धगधगीत व चैतन्यरूप असून आजकालच्या वाचकवर्गांचेंहि चित्ताकर्षण करूं शकतात. ह्या प्रकरणांतहि राष्ट्रोद्धाराला अवश्यक अशा गुणांचें वर्णन ठिकठिकाणीं फार मोहक रीतीनें केलेलें आहे. प्रत्यंतराकरितां कांहीं उदाहरणें देतों:— (१) भाग्यासी काय उणें रे । येत्नावांचूनि राहिलें । येत्न तो करावा कैसा । हेंचि आधीं कळेचिना ॥ १ ॥ मुख्य येत्न विचाराचा । त्यावरी बोलणें बरें । चालणें सत्य नेमाचें । नीति न्याय चुकों नये ॥ २ ॥ गलबला बुद्धि नासीतो । नाना निश्चय सांगती । ऐकावें कोणकोणाचें । बोलताहे बहुचकी ॥ ३ ॥ सांगोंचि जाणती सर्व । कर्तां कोणी दिसेचिना । जाणते नेणते सांगो । स्वभाव लागला जनीं ॥ ४ ॥ * * * * करंटे मिळाले सर्वें । जो तो बुधिच सांगतो । सांगावें तें आपणाला । आपणु करितां बळें ॥ ७ ॥ ( स्फु. प्रक. ) (२) धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका । काळ देखोनि वर्तावें । सांडावें भय पोटिचें ॥ १ ॥ धरावा धीर तो मोठा । विचारें पाहतां बरें । अधीर माणसें खोटीं । काम कांहीं कळेचिना ॥ २ ॥ * * * * प्रसंगीं चळचळा कांपे । तो प्राणी आत्मघातकी ॥५॥ ( स्फु. प्रक.)