भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 6, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 6

श्रीसमर्थांचें अल्प चरित्र.

लिप्त झालेलीं आहेत. तथापि त्यांत सत्यांशहि बराच आहे; यामुळे तीं टाकाऊ ठरवितां येत नाहींत. या चरित्रांखेरीज रा. देव यांनीं समर्थांची आणखी दोन चरित्रें प्रसिद्ध केलीं आहेत. त्यांत भीमस्वामीनामक समर्थशिष्यानें वर्णिलेलें चरित्र असून तें पुष्कळ विश्वसनीय व ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचें आहे. देवांनीं प्रसिद्ध केलेले 'श्रीसमर्थप्रताप''समर्थांसंबंधीं पत्रव्यवहारादि कागदपत्र' हे दोन ग्रंथ, तसेंच त्यांनीं लिहिलेली दासबोधाची प्रस्तावना यांचा- हि समर्थांचें चरित्र लिहिण्याचे कामीं विशेष उपयोग होण्याजोगा आहे. ह्या सर्व ग्रंथांच्या आधारानेंच पुढील अल्प चरित्र लिहिलें आहे. मोंगलाईंत औरंगाबाद जिल्ह्यांतील आंबड परगण्यांत जांब म्हणून गांव आहे. तेथील सदाचारी व ईश्वरभक्त कुळकर्णी सूर्याजीपंत हे समर्थांचे जनक होत. त्यांची भार्या राणूबाई हिच्या पोटीं शके १५३० मध्यें समर्थांनीं जन्म घेतला. समर्थ हे अवतारी पुरुष असून मारुतीचा अवतार होते, अशी भाविकांची समजूत आहे. त्यांचें पूर्वाश्रमींचें नांव नारायण असें होतें. त्यांस गंगाधरपंत या नांवाचे एक वडील बंधु होते. हेहि परम भाविक व भगवद्भक्त असून [L