भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 7, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 7

४ उपोद्घात. स्वरूपास नेऊन पोचवावयाचें असा त्याचा सहज स्वभाव बनणें अपरिहार्य होतें. 'संसारत्याग व मोक्षमार्गानुगामी परमार्थाचें ग्रहण' हें भक्तिमार्गाचें मुख्य ध्येय नारायणाच्या चटकन लक्ष्यांत येऊन त्यांत त्याची तंद्री लागून राहिली आणि त्या- मुळें संसार करण्याचा त्यास साहजिकच कंटाळा वाटूं लागला. तो संसारा- विषयीं पूर्ण उदासीन बनून ईश्वरचिंतन करून ईश्वराचा शोध करण्याच्या मार्गास लागला. त्याच्या आईनें व ज्येष्ठ बंधूनें त्याच्या भक्तिभावाच्या उत्तान स्वरूपास मर्यादित करण्याचा पुष्कळ यत्न केला, पण तो साहजिकच व्यर्थ गेला. बाल- पणीं बरोबरीचीं मुलें घेऊन रानावनांत फिरणें, जलाशयांत पोहणें, शरीरसामर्थ्य वाढविणें इत्यादि कर्मे स्वैरपणें नारायण करीत असे. यथाकालीं त्याचें मौंजी- बंधन झालें व तत्कालीन पद्धतीप्रमाणें थोडेंबहुत शिक्षणहि झालें. पुढें लग्नाचें वय आलें, तरीहि त्याचा पूर्वीचा क्रम चालूच होता. मात्र त्याच्या प्रत्येक कृतींत व वागणुकींत लोकोत्तरपणा दृग्गोचर होत असे. इतर मोठमोठे सत्पुरुष जसे भग- वत्साक्षात्कारी होऊन जगदुद्धार करिते झाले त्याप्रमाणें आपणहि करावें अशी भावना नारायणाच्या मनांत बाणली आणि त्याच कारणामुळे त्यानें लग्न कर- ण्याचें टाळलें. त्याचे वडील बंधु व मातोश्री यांनीं बळेंच त्याचा विवाह कर- ण्याचा घाट घातला. तेव्हां लग्नमंडपांतून आयत्या वेळीं त्यानें पलायन केलें. (शके १५४२) या वेळीं त्याचें वय अवघें १२ वर्षांचें होतें. इतक्या अल्प वयांत नारायणास उपरति व्हावी ही गोष्ट असामान्य आहे, यांत शंका नाहीं. परंतु अशा गोष्टी अशक्य कोटींतील मात्र नाहींत. तैलबुद्धीच्या व तेजस्वी आणि करारी पुरुषांच्या भावना अल्प वयांत देखील अत्यंत उत्कट व दृढ असतात, असें सृष्टीं- तील अनेक थोर व श्रेष्ठ पुरुषांच्या उदाहरणांवरून सिद्ध करितां येईल. बालपणीं अशा पुरुषांच्या डोक्यांत एखादी कल्पना अगर भावना संचरली कीं पुरे; लागलीच ती तेथें दृढ होऊन तदनुसार कृति होण्यास विलंब लागत नाहीं. लग्नविधि चालू असतां नारायणानें केलेलें पलायन हें वरील गोष्टीचेंच प्रत्यंतर होय. “संसार मिथ्या आहे; त्याचा त्याग करून परमार्थसाधन करणें यांतच नरदेहाचें सार्थक आहे.” अशी कल्पना ऊर्फ भावना नारायणाच्या मनोभूमींत दृढतर झाल्यामुळे त्यास सहज लीलेनें, मोहक अशा लग्नसोहळ्याचा त्याग करितां आला. नारायण लग्न- मंडपांतून नेसलेल्या व पांघरलेल्या २ धोतरांनिशीं घराबाहेर पळत सुटला, तेव्हां

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 7, कुल 467 में से · BharatKosha