भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 122, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 122

९४ सार्थ तुकारामगाथा

पांचां संवगडिया एकचि घाई । तेथें नाद वरवा उमटला रे । ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो हो खेळ निवडिला रे ॥ ५ ॥ ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एकचि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥ ६ ॥ आणीक खेळिये होउनिया गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गढे हो हुशारुनि खेळा । पुढिलांचि धरूनियां सोई रे । एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥ ७ ॥

शब्दार्थ व टीपा - दुचाळपानें-द्वैताच्या भावनेने, बसवंत-उपास्य दैवत, संक्तर-स्वतंत्र.

अर्थ - एकत्वाच्या भावनेने, अद्वैताच्या वृत्तीने तू जर खेळ खेळलास तर मग मात्र संसाराच्या डावात किंवा चवरात तू सापडणार नाहीस. द्वैताच्या भावनेने खेळशील तर भाई, फसशील रे बाबा. तू यामुळे सत्त्व रज, तम या त्रिगुणांच्या चवरात सापडून फारच कष्टो होशील. म्हणून पुढे दिलेल्या चौघांची उदाहरणे नीट ध्यानात धरून तू वाग १ जगातील संसाराचा जरी तू खेळ खेळलास तरी तू अलिप्त राहा बाह्य विषयांची भारी संगत तू सोडून दे. अशाच खेळामुळे तू प्रत्यक्ष ईश्वर होऊन जाशील हे माझे सत्यवचन भाई, तू नीट समजावून घे. २ पंढरपुरात एका शिंप्याचा पोर नामदेव नावाचा एक थोर खेळगडी होऊन गेला त्याने श्रीविठ्ठलासचे आपले आराद्य दैवत बनविले व आपल्या सर्व सोबत्यांना याच मार्गाची त्याने शिकवण दिली व वारकरी पथाचा स्वतंत्र फड पंढरीच्या वाळवंटात निर्माण केला याने एकत्वाच्या वृत्तीने खेळ खेळल्यामुळे त्याची कुठेच फसवंत झाली नाही, की तो कुठे चुकला नाही. त्यामुळे त्याला मत लोकही मान्य झाले ३ ज्ञानदेव, मुक्ताबाई, चांगदेव वटेश्वर, सोपानदेव यांनी आनंदाने खेळ सुरू करून कान्होबा गवळी यास आपले उपास्य दैवत बनविले. त्याच्या भोवती फेर धरून ते नाचले. त्या सर्वांना मिळून एवढमच आपल्या प्रभूविषयी आवड निर्माण झालेली पाहून ब्रह्मादिक देवही त्याच्या पायांवर नम्र होण्यास तत्पर झाले. ४ प्रसिद्ध साधू कबीरदास याने रामचंद्रास उपास्य दैवत वरून खेळ करावा लाधला. कबीर व राम याची जोडी फार चांगली जमली. या पाच सोंगड्यांनी खेळाची एवच घाई धरून ईश्वरभजनाचा नाद फार श्रेष्ठ प्रकारचा निर्माण केला. ब्रह्मादी व श्रेष्ठ देव यांनी सर्व खेळात यांचा हा खेळच निवडला ५ पैठणच्या ब्राह्मणाचा पोर एकनाथ हा एक असाच थोर खेळगडी होऊन गेला ह्याने जनार्दनास खेळगडी बनविले जनार्दन स्वामीस उपास्य दैवत बनविले व वैष्णवांचा मेळा पुनः जमा केला व एकच अशा खेळाच्या घाईत आपण स्वतःच तो जनताजनार्दन स्वरूपी होऊन गेला ६ आणखीही पुष्कळ खेळगडी पोर थोर होऊन गेले; त्यांचे वर्णनही करायला समर्थ अशी वाणी मजजवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गड्यांनो, चांगले सावध राहून खेळ खेळा आधी होऊन गेलेल्या सत खेळाडयाचा मार्ग ध्यानात धरून खेळा एकच घाई करीत असताना जर खेळगडी चुकला तर मात्र तो संसाराच्या डावात पुरता फसेल. ७