भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 173, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 173

सार्थ तुकारामगाथा १४५ धारणा अशी की आम्ही भक्तांनीच ब्रह्मदेवासही जन्म दिला आम्ही भक्त आहोत म्हणून देवास देवपणा आहे आम्ही पतित आहोत म्हणून तो पतितपावन म्हणून नावारूपास आला आहे नाही तर त्याला कोण पुसतो ? 'जरि मी नव्हतों पतित । तरि तू पावन कंचा तेथ ?' म्हणून त्यांनी एकदा परमेश्वरास विचारलेच आहे 'लोहें महिमान परिसा। नाहीं तरी दगड जैसा' लोखंड आहे म्हणून परिसाचे महत्त्व भक्त आहे म्हणून देवाचा महिमा मूळ आहे म्हणून तर ती बाई आईपणास आली बाईने मुलास जन्म दिला खरा, पण या मुलानेही आपल्या जन्माबरोबर बाईस आईपणाचा जन्म दिला भक्ताने ईश्वराचे स्थान स्थिर केले असा मजेचा खेळ आहे हा २९६ ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय १भिलटीचीं ॥ १ ॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ २ ॥ पल्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडेच ॥ ३ ॥ न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तोपुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडीची-प्रेमाची, भिलटीचीं-शबरी नावाच्या भिल्लीणीची, पल्हे-पोहे, फके-मूठ अर्थ - भक्तांचा महिमा केवढा असतो तो नीट ऐका ना. या रामाने प्रेमापोटी शबरीची उष्टी बोरे वनवासात असताना तिचे प्रेम पाहून खाल्ली. १ हा ईश्वर भक्ति-प्रेमाचा मोठाच भुकेलेला असतो, त्याच्या घरी याचाच दुष्काळ असतो त्याला खरे म्हणजे आठही सिद्धी व क्षीरसागर याचा लाभ असूनही तो त्यांना मानीत नाही २ दरिद्री सुदाम मित्राचे पोहे खाण्यासाठी हा लोभावलेला असतो घरी दुधाचा समुद्र असूनही ते पोहे कोरडेच खावयास याला आनंद वाटतो ३ प्रीतीच्या पोटी तो वस्तु उष्टी आहे की थोडी आहे हेही पाहात नाही ४ विवरण .- देवास भक्ताचे प्रेम किती थोर वाटते, तो त्याच्यासाठी किती आसुसलेला असतो याचे वर्णन संतानी अनेक अभंगातून केले आहे येथे शबरीच्या उष्ट्या बोराच्या कथेचा संक्षेपान उल्लेख केला आहे शबरी एक भिल्लीण ही रामावताराच्या वेळी दक्षिणेत मातंग ऋषीची व त्याच्या शिष्याची सेवा करून राहात असे रामचंद्र वनवासात असताना जेव्हा या अरण्यात आले तेव्हा हिने रामलक्ष्मण यांचे उत्तम स्वागत केले रामाचे आगतस्वागत करून हिने ताजी बोरे रामचंद्रास खावयास दिली ती चाखली चांगली अशी निवडून, चाखून पाहून तिने रामासाठीच वेचून ठेविली होती अशी कल्पना सुदामदेव श्रीकृष्णाचा परममित्र दरिद्री व वद्रावस्थेत राहिला, पण श्रीकृष्णभेटीस तो त्याच्या सुवर्णाच्या राजवाड्याकडे निघाला तेव्हा त्याने फडक्यात मूठभर पोहे बांधून घेतले श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमाने ते कोरडेच खाल्ले अशी कथा आहे २९७ कोणे तुझा साग केला अगीकार । निश्चिंत त्यां थोर मानियेली ॥ १ ॥ कोणे ऐसा तुज उपदेश केला । नको या विठुला शरण जाऊं ॥ २ ॥ तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥ ३ ॥ का रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेदिस बळ क्षीण होतें ॥ ४ ॥ तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अगीकार-स्वीकार, वदन-तोंड, नागवसी-फसतोस अर्थः-तुझा कुणी स्वीकार केला आहे म्हणून तू एवढ्या निश्चिंततेने वागू लागला आहेस ? १ या विठ्ठलाला शरण जाऊ नये असा तुला उपदेश तरी कुणी केला आहे रे ? २ जेव्हा यम पाठीशी लागेल व तुझे तोंड भूमीला लागेल, तेव्हा तुझी बाजू कोण सांभाळणार आहे ? ३ उगाच कां आयुष्य फुकट घालवितोस ? नागविला जातोस ? फसतोस ? हा काळ आयुष्य घालवोत बसला आहे ना दिवसेंदिवस बळही क्षीण होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, याला कुणी तरी सांगायला हवे कारण हा मायबाप असा जो श्रीहरी त्यास विसरला आहे. ५ १ भिल्लणीची तु गाथा . १९

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 173, कुल 611 में से · BharatKosha