सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 195, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १६१ अर्थ - एखाद्या स्वप्नामधील गोष्टींप्रमाणे या कामक्रोधांनी मला वेडीस धरले होते, जन्ममृत्यूने मला बळजबरीने कामास जुंपले होते १ मग या आपत्तींतून सुटावे म्हणून स्वप्नात मी व्यर्थच ईश्वराची प्रार्थना केली पण त्यापासून मला त्रासच झाला जागे होऊन पाहतो ते स्वप्नातील श्रीमंत, राजा, दरिद्री, भिकारी हे काही त्याच्या स्थानावर नव्हते २ जोपर्यंत मी आत्मबोधाने जागाच झालो नव्हतो तेव्हा स्वप्नातील तो त्रास मी स्वतः भरपूर सोसला आता जागृत असताना तोच अनुभव हे सांगत आहे या युक्ताने मात्र माझे डोळे पुरते उघडले. मी सावध झालो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या साधुसंतानींच मला या स्वप्नातील दुःखातून सावध केले नाही तर पहिल्याने या हरिनामाविषयी माझे तोंड बद्ध होते. ४ ३३७ आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥ याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ २ ॥ काळकुट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्षी देतें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरी जातीसवे भेटी । नवनीत पोटीं सांटविले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, अतिवादी-वृथा वाद करणारा अर्थ - काही लोकांचा स्वभावच आसुरी असून अंतःकरण निर्दय असते अशी माणसे मनाची निष्ठुर असून वृथा वाद करणारी असतात १ अशा वेळी अमुक एक चांगल्या कुळातील, अमुक वाईट कुळातील असा विचारच अयोग्य असतो अंगच्या गुणाचे महत्त्व या ठिकाणी प्रमुख असते २ पितळ व सोने दोन्ही पिवळचा रंगाची असली तरी पितळ कालांतराने काळेकुट्ट पडते व सोने आपल्या शुद्ध व तेजस्वी रंगाने नेहमी चमकून राहते. दोघांची अंगेच त्याच्या गुणावगुणांची साक्ष देतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या जातीच्या माणसाची मला भेट व्हावी. मी त्याचा सहवास नवनीताप्रमाणे पोटात साठवीन किंवा प्रभुप्रतीचे नवनीत ज्याने आपल्या पोटी साठविले आहे अशा चांगल्या जातीच्या माणसाशी माझी भेट व्हावी ४ विवरण - या अभंगातील 'याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगीं' हा विचार भागवत- धर्मीय परंपरेस शोभून दिसणारा असाच आहे बगच्या गुणावरून पारख व्हावी. वरवरच्या जन्मजात जातीवरून होऊ नये आणि भक्तीच्या क्षेत्रात तर ह् जातीभेदाचे थड असू नये असा एक आग्रहाचा विचार सर्व संतानी सांगितलेला आहे एकदा ईश्वराकडे मोहरा वळला म्हणजे हा अमुक एक जातीचा अशी स्थिती उरतच नाही तुकारामबुवांनीच एका ठिकाणी म्हटले आहे, 'भावता भेदाची जाव उठाउठी । तुका म्हणे भेटीं गोंविदाचे' जे ईश्वराचे भक्त झाले, ज्यांना सो ध्यास लागला त्याच्या बाबतीत यातिकुळाचा विचार हा बरोबर नसतो 'याति- कूळ माझें गेलें हारपोनि' असे स्वतः ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे तुकारामबोवांनी तर स्पष्टच निर्वाळा दिला आहे की, 'जिहीं म्हणविले हरीचे भक्ति । जातीचे ते होत कोणी तरी ॥ जातीकुळ नाहीं तयासी प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे' एकदा परमेश्वरास शरण गेल्यावर मग वर्ण व जाती हा भेद उरत नाही हे ज्ञानदेवांनीही नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरीत स्पष्ट मेल्याचे आपण पाहिलेच आहे तुकारामबुवानी त्यानेच मत पुढे आणखी स्पष्ट केले आहे 'वर्णा- भिमान विसरलीं याती । एकमेकां लोटांगणीं जाती रे' हरिभक्ताची एवढा पदवी मिळाली की मग हरिभक्त हीच एक जात इतरांच्याही दृष्टीस ठरने चोखोबांची जात मग कुणामच दिसली नाही या यातिहीन भक्ताची महती गाताना जनाबाईने म्हटले आहे 'चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥ परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥' एकनाथांनीही 'चोखियाची भक्ती कैसी । प्रेमें आवड देवासी ॥' म्हणून चोखोबाचा गौरव केला आहे कारण या अभंगात सांगितल्याप्रमाणे गुणांचे कारणच माणसाची पारख करीत असते ३३८ बाळपणीं हरि । खेळे मयुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा पाकी । तु गाथा २१