भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 214, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 214

१८० सार्थ तुकारामगाथा कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्व सुख त्या संगतीं । घडेल पंगती संतांचिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- समागम-सहवास, परी-प्रकाराने, श्वानयाती-कुत्र्याची जात होऊन, कामारी-काम करी, रंक-गरीब अर्थ - संताचा सहवास अगदी हलक्या मार्गाने साधता आला, त्याच्या दारांत कुत्र्याच्या जातीचे होऊन राहता आले तरी राहावे, १ कारण त्या ठिकाणी रामनामाचे श्रवण होईल व संताच्या भोजनानंतर उच्छिष्टाचे सेवन करायला मिळेल २ तेथे कामकरी बटीक अशा गरीब वृत्तीनेही राहावे व संताची सेवा करावी. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या संताच्या संगतीत सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील त्याच्या पंगतीत सुखमय असे भोजन घडेल. ४ ३७५ एकली राणागोविंदा सवे । गेले ठावें तें जाले ॥ १ ॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळो । नाही विषम जवळों आतळले ॥ २ ॥ नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट सग केला ॥ ३ ॥ भेणे मिठी दिधली गळा । सेजे जवळ दडाले ॥ ४ ॥ सलगी धरो पयोधर । साहाती करमुर सवे ॥ ५ ॥ आहेव मी गर्भीणपणे । हे सांगणे का लागे ॥ ६ ॥ तुका म्हणे सेवटा नेले । सपादिले उभयता ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - शिंदळो-वाईट चालीची स्त्री, विषम-विरुद्ध, सग-सहवास, सोबत, भेनें-भयाने करमुर-एक प्रकारचे शस्त्र, आहेव-सौभाग्यवती अर्थ :-त्या गोविंदाबरोबर रानावनात मी एकटी गेले हे तुम्हांस कळले वाटते ? १ पण त्यासाठी मला वाईट चालीची म्हणू नका असे मी पुन पुन सांगते हो मी त्याच्याजवळ गेले हो काही लोकविरुद्ध गोष्ट मी केली असे नाही २ मी या रानाची वाट कदा पाहिली नव्हती, मला ती माहित नव्हती म्हणून धीटपणाने त्याची सोबत घेतली ३ रानावनातील श्वापदाच्या भयात मी त्याच्या गळ्यास मिठी मारली, मी त्याच्या शेजेजवळ दडून राहिले, म्हणून काय झाले ? ४ त्याने गमतीने, थट्टेत माझे स्तन धरले, पण मी मात्र त्याचे करणे एक प्रकारच्या शस्त्राप्रमाणे मानले, सहन केले ५ मी गर्भिण असले तरी मनात संशय धरू नका तुम्ही मी सौभाग्यवती आहे ना ? तुम्हास हे सब सांगावया हवे का ? ६ तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माहिती देऊन तिने उभयताचा लौकिक वाढवून आपले काय शेवटास नेले ७ विवरण - येथून पुढच काही अभग शृंगारमिश्रित अशा भक्तित्मायनचे आहेत श्रीकृष्णाशी आलेला सबंध गोळणीच्या वा गापांच्या निमित्तान रिता विविध प्रकारचा होता, त्यात किती नाजुक छटा होत्या, याचे मोठे मनोहर वर्णन तुकारामबुवांनी विविध प्रकारात कल आहे वरवरचा भावा शृंगाराची व स्त्रीपुरुष प्रमाची, परंतु बोध किंवा अनुभव मात्र आत्मानुसन्धानाथा, भक्ताचा असा हा प्रकार या अभंगाचा आहे माग अभंग क्र ७ वर विवरण केले आहे त पाहाव ३७६ होते बहुत हे दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ॥ व्हावी भटी ते जाली गोविंदासीं । आता सेवा करीन निश्चयेंसीं वो ॥ १ ॥ स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न साहाये वारा । देउनि कपाट आले तें दुसरें वारा वो ॥ २ ॥