भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 215, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 215

सार्थ तुकारामगाथा १८१ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदीं वेगळें होऊं एक घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी । आतां येणे काळें या वो लोभें वेडी वो ॥ ३ ॥ उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चितीने निश्चितो सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साहे-मदत, सायासाची-प्रयत्नाने अर्थ - या गोविंदाची भेट व्हावी असे माझ्या मनात फार दिवसापासून होते आज मात्र माझे सर्व नवस फळास आले आहेत, पूर्ण झाले आहेत कारण आज त्या गोविंदाची व माझी भेट झाली आहे आता मी त्याची जन्मभर सेवा करीत राहीन १ तुम्ही मात्र स्थिर राहून मला साह्य करा मी आजवर जन्ममृत्यूच्या फेरा घालून खूप कष्ट सहन केले आता येथे मला दुजेपणाचा वारा सुद्धा सहन होत नाही मी आज दुजेपणाचे दार लावून आले आहे दुजेपण आता दूर सारा २ मूळ स्वरूपाच्या सत्तेत असणारे हे स्थान मी मोठ्या प्रयत्नाने मिळविले आहे आता त्याच्यापासून एक क्षणभरही मी दूर होणार नाही यासाठी मी लौकिकाचीहो फिकीर करणार नाही आता यावेळो याचाच लोभ मला जडून मी त्याच्या नादाने वेडी झाले आहे हो ३ निजात्मबोधाच्या उदयाने माझाही उदय झाला भी निश्चित झाले आहे याची गोडी फार लागल्यामुळे तिचाही आस्वाद फार घ्यायला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा भाग्याचा दिवस मागितला तरी पुन दिसणार नाही ४ ३७७ स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेंचि त्याचा जीव वो ॥ १ ॥ आपआपणांशीं करितो नवल । परि वादावाद न संडितो बोल । एका मेघशामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सलोल वो ॥ २ ॥ एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरीं । अंध बहिर हे प्रेतलोकाचारी । त्याची कीर्ति गाइली पुराणांतरीं वो ॥ ३ ॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवों आदर । परस्परे हैं साबरा सादर । योग रञ्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥ ४ ॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐसे ठेवी उरी । दुरी जवळी सचिता एसे घरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥ ५ ॥ तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें योरलून । पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयीं चरण वो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नवलाव-नवल, जलधर-मेघ, पराविया-दुसऱ्याच्या अर्थ - श्रीकृष्णप्राप्तीचा अनुभव असा स्वतःस आल्यानंतर त्या गोपी एकमेकींना तो मोठ्या प्रीतीने सांगू लागल्या हा श्रीकृष्ण नाना रूपे घेऊन सर्वांनाच कसा मिळाला ? हे नवल कसे घडले हो ? तो सर्वसाक्षी जो श्रीकृष्ण त्याच्याच ठिकाणी त्याचा जीव जडून राहिला १ मग त्या आपापसात नवल करू लागल्या त्यांच्या विषयांच्या वादविवादात सुख असल्यामुळे त्या ते सोडीत नाहीत या एका मेघश्यामाच्या, कृपेच्या मेघाच्या ओलाव्यामुळे त्यांचे हृदय प्रीतीने द्रवून गेले आहे २ त्या सर्व गोपींचा एकच विषय म्हणजे तो श्रीकृष्ण बनला आहे त्याच्या- वरील प्रीतीमुळे त्यांना इतर वस्तूवरील प्रीती ध्यानात येते बाह्य लौकिकाविषयी या गोपिका अंध, बहिऱ्याच झाल्या आहेत लोकाच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष नाही परंतु त्याची कीर्ती साऱ्या पुराणांनी गाइली आहे ३ आपल्या आवडत्या व प्रीतीच्या माणसाची स्तुती कुणी दुसऱ्याने केली तर ती अधिक रुचकर लागते कारण आपल्या प्रीती- पात्राचा गौरव त्यात असतो व त्याच गौरवाविषयी आवड आपल्या मनात निर्माण होते म्हणून या गोपी परस्परांशी

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 215, कुल 611 में से · BharatKosha