सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 221, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १८७ हरी ? तू काही माझे ऐकत नाहीस. तुला सांगावे तरी कसे ? कारण तू परा वाचेच्याही पलीकडे पळून जातोस मोठाच अनावर तू झाला आहेस. लौकिका वेगळा होऊन वसला आहेस' १ अशी ही कृष्णाची आई मोठ्या करुण वाणीने म्हणत आहे, 'मी आता किती लोकांचे आघात तुझ्यामुळे सोसू रे ? मला इतर कामांस वेळच मिळत नाही, रोज हीच कटकट वाढत आहे. कृष्णा, तूच शांतचित्ताने यातून मला सोडीव रे बाबा. २ घरी पुष्कळ कामे असून त्यांत मी गुंतून राहिलेले आहे; आणि तू डोळा चुकवून बाहेर जातोस. काही केल्या तू क्षणभरसुद्धा परत येत नाहीस. तुला पकडण्यासाठी काही प्रयत्न करावेत असे उरलेच नाहीत ३ अनंता, याता यापुढे मी तुला पुन काही कामे सांगणार नाही. पण तू आता माझ्या डोळयापुढून जाऊ नकोस दूर. तुझ्याशिवाय मला आता दुसऱ्या कोणाचीही प्राप्ती नको आहे.' तुकाराम महाराज म्हणतात, हा तुकयाचा स्वामी कान्होबा असा गुणसंपन्न आहे. ४
३८७ घाली कवाड ढळली वाड राती । कामे व्यापिली कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवंचे हातीं । आजी शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥ १ ॥ बोले ऋतिकेशीं राधा हें वचन । मशों लाघव दाववी नारायण । म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज *पूर्ण वो ॥ २ ॥ धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । ते पाचारिलें होउनि ये वो सीता । लाजिनली रूप न ये पालटिता । झाला सोमकने आपण रामें रीता वो ॥ ३ ॥ सत्यभामा दान करी नारदासी । तें कळला वो मज हृषीकेशी । तुळे घालितां न ये कनक वो राशी । सम तुके एक पान तुळसी वो ॥ ४ ॥ मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रह्मचारी । दिली वाट यमुने माये खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरो वो ॥ ५ ॥ जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भावचि कारण वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कवाड-दार, वाड-मोठी, संबोखिली-समजूत काढली.
अर्थ : - 'फार रात्र झाली आहे. आता दार लाव. या राधेचे हृदय श्रीकृष्णाच्या विरहाने व्यापून जाऊन ती उदास झाली आहे हा पुन्हा सुदैवी स्त्रीच्या हाती सापडला की काय ग ? आज माझी शेज तर पतीशिवाय शून्य दिसत आहे !' अशा प्रकारचे वचनही राधा आपल्या सखीजवळ बोलत आहे; ती म्हणते, 'हा नारायण मोठे कौतुक मला दाखवितो. हा मनाचा मोठा कोमळ आहे ग; पण फार निर्गुण, अवगुणी बरं. मी याला त्याच्याशी बोलणारच नाही. तो संपूर्णपणे मला समजला आहे. २ द्वारकेस असताना श्रीहरीने गरुडास पाठवून हनुमंताला बोलावून आणले; व स्वतः श्रीहरी रामरूप झाले व सत्यभामेस सीता होऊन तू ये असे त्यांनी सांगितले. पण सत्यभामेस आपले रूप एकदम पालटून सीता होता येईना तेव्हा तो फार लाजली तेव्हा मग रुक्मिणी सीता झाली व हा स्वतः राम झाला. ३ सत्यभामेने नारदास या श्रीहरीचे दान केले तेव्हाच तो कसा आहे हे मला समजले. श्रीकृष्णाची तुला करण्यासाठी सत्यभामेने आपल्या दागिन्यांच्या सर्व राशींच्या राशी घातल्या तरी त्याची तुलना होईना, मग रुक्मि- णीने एक तुळशीचे पान टाकल्या बरोबर तुला पुरी झाली. ४ मला कसा विसर पडला, कुणास माहीत ? आम्हांस भोगून हा मी ब्रह्मचारी आहे असेच म्हणाला होता त्या वेळेस हे वाक्य म्हटल्याबरोबर यमुनेने वाट दिली. अजूनपर्यंत तुम्हाआम्हात याची थोरवी समजलीच नाही. ५ हा नारायण श्रीहरी सर्व जीवांचे विचार जाणतो. कारण तो सर्वत्र व्यापून राहिलेला असून तो लपून राहिला असल्यामुळे दिसत नाही एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात, राधेची स्वतः विषयीची प्रीती जाणून त्याने तिला आलिंगन देऊन तिची समजूत काढली कारण भावभक्तीनेच हा प्रभू सर्वांनाच प्राप्त होतो. ६