सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 252, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२१८ सार्थ तुकारामगाथा विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगातून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबानी सर्वसामान्य जनतेस रूपकाच्या भाषेत बोध केला आहे तुकारामासारख्या अनेक मराठी संतानी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक अनुभूती याचा त्यांनी स्वत अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत काव्याच्या आधारे शब्दबद्ध केला रामकृष्णच्या, कौरवपांडवाच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशांत आलेला नसल्यान, पुस्तकें मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतानी केलेच, पण त्याच्या कार्याला फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा समिश्र वर्ग होता हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव, वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाले इत्यादींचा हाय अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात आज नाही उद्या या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत महाराष्ट्राच्या समाजशिक्षणाचे हे एक प्रधान अंग होते निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खेडे सोडून न जाणाऱ्या शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या दैवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र, रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट योगी, वाघ्या मुरळी, बाळसंतोष, शरोदा (पिंगळा ), कुडमुड्या जोशी, कोल्हाटी, डोंबारी, फकीर, जागले, भोपी, बहुरूपी, कडकलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकाराच्या लोकांनी केले आहे याच्या परमार्थनिरूपणास विनोदाची, अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची भावत समाजास उपकारक वाटली या काही व पुढल्या तीनचार अभंगात तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले आहे वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ, त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत श्रीकृष्ण किंवा विठ्ठल याची उपासना हे लोक करतात याचा वेष बालकृष्णाचा असतो डोक्यावर मयूरपिसाची टोपी असते, पायात घुंगूर असतात ताडाशी अलगुज असते जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो त्यावर तांबडे अलवण असते कृष्णभक्तीची गाणी गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतानीही अभंग रचना केलेली आहे ' मुळुमुळा वाजवो टाळ । झणझणा नाद रसाळ ' या चरणाचा ज्ञानदेवाचा एक नादमधुर अभंग वासुदेवावर आहे ' वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहं सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी ' अशा भाषेत एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे ४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अजून । जागे होऊनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झाकों लोचन गा ॥ १ ॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना । चिपळया टाळ हातीं मुर्ली घोप । नारायणा २ गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । ह्या परी मीस घेऊ नका भाई । पुढें विन्मुख होता वरे नाहीं गा ॥ ३ ॥ देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त । जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठी नका करु वाताहात गा ॥ ४ ॥ १ ऐको झाकीनि, २ नामनारायणा गा १०