भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 294, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 294

Here is the complete Devanagari text transcription of the page:

सार्थ तुकारामगाथा २६१ षा ? २ उशीर झाला, उशीर झाला, असे म्हणावे का ? आईने बालकाविषयी कधी राग धरू नये. ३ देवा, तुझ्या संगतीत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व गोपाळ मिळून तुझ्या नामाची गर्जना करून आनंद लुटू. ४ ५१३ कळस वाहियेला शिरों । सहस्रनामें पूजा करीं ॥ १॥ पीक पिकले पिकले । घन दाटोनियां १ आले ॥ २ ॥ शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥ ३ ॥ तुका म्हणे पोट । भरले वारले बोभाट ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कळस-मुकुट, बोभाट-तक्रार, वारले-निवारण झाले अर्थ :- या देवाने आपल्या मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे. या देवाची मी सहस्र नामांनी पूजा करीत आहे. १ पाच्या नामस्मृतीचे पीक अफाटपणे पिकले असून त्याची छाया सर्वत्र घनदाटपणे पसरली आहे. २ शेवटचे दान म्हणून हा नारायणच आमच्या वाट्यास आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या प्राप्तीमुळे आमचे पोट भरले आहे आणि इतर सर्व तक्रारी निवारण झालेल्या आहेत. ४ विवरणः-हा व याच्या आधीचे पाचसात अभंग हे तुकोबांच्या मनाच्या तृप्तीची भावना दर्शविणारे आहेत. पंढरीनाथाची आरती वगैरे झाल्यानंतर संतुष्ट चित्ताने देवाची करुणा भाकावी, त्याचे ऋण मान्य करावे, त्याचा प्रेमाने निरोप घ्यावा, पुन्हा त्याला एकचित्ताने आठवावे, त्याच्या प्रसादाची वाट पाहावी, त्याच्या उच्छिष्टाची आशा करावी इत्यादी भाववृत्तींनी हे सर्व अभंग आर्द्र झालेले आहेत. अर्थाला तुकोबांचे अभंग जितके सोपे, सरळ तितकी त्यात भक्तिभावाची आर्द्रता अधिक असते असे दिसून येईल या अभंगात 'सहस्रनामें पूजा करी' असा एक उल्लेख आला आहे तो महत्त्वाचा आहे भागवत संप्रदायात विष्णुसहस्रनामास पूर्वीपासून मोठेच महत्त्व आहे महाभारतातील अनुशासनपर्वाचा ४९ वा अध्याय म्हणजे महत्त्वाचा मानला जातो विष्णूचे सहस्रनामानी ध्यान करण्यास याचा उपयोग मोठाच असतो. 'नामाचेया सहस्रबरी । नावा या अवधारी । सज्जन्या संसारी तारू जाहलों' असा ज्ञानेश्वरांनी या सहस्रनामाचा उल्लेख केलेला आहे. 'सहस्रनामाचे वाटगें । साडीं घेतले नेटगे' असा याचा उल्लेख नामदेवानी केला आहे. तुकोबांच्याही पाठात हे सहस्रनाम 'नाव धड करा सहस्रनामाची', 'नाममंत्रमाळा । विष्णुसहस्र', 'सहस्रनामाची आरोळी', 'केली सहस्रांची माळ' इत्यादी उल्लेख तुकोबाच्या अभंगात इतरत्रही सापडतात. ५१४ आरुष शब्द बोलों मनौ न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुची आई ॥ १॥ देईं गे विठाबाई प्रेमभातुके । अवघियां कवतुके लहाना थोरां सकळा ॥ २॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया। पाहे कृपादृष्टी आता पंढरीराया ॥ ३॥ तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वाकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आरुष-अडाणी, बोबडे, भातुके-खाऊ अर्थ :- हे विठाई, तूच आमची आई आहेस. आम्ही अडाणीपणाने काही वेडेवाकडे व बोबडे शब्द बोललो असलो तरी तू ते मनात काही धरू नकोस आम्ही तुझीच लडिवाळ बाळे आहोत ना ? १ विठाबाई, आई, तू आम्हाला प्रेमाने, कौतुकाने खाऊ दे. सर्व लहानथोर भक्तांना कौतुकाने तू प्रेमाचा खाऊ दे ना २ आमच्या मनात भाव असो वा नसो, पण आम्ही तुलाच शरण आलो आहोत. पंढरीनाथा, तू कृपादृष्टीने आमच्याकडे पाहा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही वेडीवाकुडी असलो तरी तुझीच आहोत. पण तू नामस्मरणाने संतुष्ट होऊन आमचे भवपाश तोडून टाक. ४ ५१५ आडकले देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥ १ ॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं अजगरा ॥ २ ॥ १ मोडोनिया.