भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 319, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 319

सार्थ तुकारामगाथा २८५ तो सुखाचा वाटा आम्हास देतो आणि दुःख स्वतःसाठी ठेवितो दुःखाचा घोट स्वतःच तो गिळीत असतो ४ आमचे सरंक्षण करण्यासाठी हा आम्हास पाठीशी घालतो व स्वतः प्रत्यक्ष काळाशी झगडण्यासाठी पुढे होतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा कृपेचा सागर आमच्या रक्षणासाठी भवसागरातील नावेत उतरलेला असतो ६ ५७७ रवि रश्मिकळा । नये काढिता निराळा ॥ १ ॥ तंसा आम्हा जाला भाव । अगीं जडोनि ठेला देव ॥ २ ॥ गोडी साखरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रश्मिकळा-किरणांचे तेज, ठेला-स्थिर जाला अर्थ - सूर्याची किरणे व त्याचे तेज याना सूर्यापासून वेगळे काढता येत नाही १ त्याप्रमाणेच देवाचे व आमचे नाते असून तो आमच्या सर्वांगातच स्थिर झालेला आहे २ साखरेपासून तिची गोडी निराळी काढता येईल काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो जो शब्द उमटेल, तो आकाशाच्या पोटातच विरून जाणार. जो जो भाव उमटेल, तो तो ईश्वराच्या रूपातच सामावलेला असणार ४ ५७८ थोडें परी निरें । अबिट तें घ्यावे सरे ॥ १ ॥ घ्यावें जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ २ ॥ चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥ ३ ॥ आपले तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरें-स्वच्छ अर्थ - अगदी थोडे, पण स्वच्छ असलेले व वीट न येणारे, यथार्थ असेल तेच घ्यावे १ असे घ्यावे की, ज्याची कमतरता कधी पडूच नये एका बीजातून अनेक नवी बीजे तयार होतात तसे व्हावे २ आपले चित्त आपणास साक्षी ठेवावे, इतरांच्या उपचाराची पर्वा ठेवू नये ३ आपले हित नेमके कशात आहे ते पाहावे यातच सब सार आहे ४ ५७९ अवघे देव साध । परी या अवगुणाचा वाध ॥ १ ॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ २ ॥ ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा ¹ निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साध-साध्य अर्थ - सर्वत्र व्यापून राहिलेला देव हे एकच असून तो साध्य करून घेणे हे कर्तव्य असले तरी या अंगाच्या अवगुणामुळे बाध येऊन तो साधत नाही १ हे तत्त्व एकासारखे दुसरे दिसत असूनही हे त्यासारखे नसते २ ऊस व कांदा एकाच आळ्यात लाविले तरी त्याचा स्वाद व त्याची गोडी या गोष्टी वेगळ्याच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात विषाची व अमृताची बरोबरी होणार नाहीच ४ ५८० शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥ १ ॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ २ ॥ खवळलिया कामक्रोधीं । अगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपोआप ॥ ४ ॥ १ पाहता