भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 321, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 321

अर्थ - मोहोर जातीच्या दगडाबरोबर सूत असेल तर ते अग्नीत टाकल्यावरही जळून जात नाही १ नाही तर एरवी हे सूत त्या अग्नीचेच भक्ष्य असते, हे काय सांगायला हवे ? २ एकदा स्वामीच्या अंगासारखे, देवाच्या अंगासारखे भक्ताचे रूप झाल्यावर मग ते इतरासारखे राहात नाही त्याला कुणाचेही भय उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा घोडयाच्या गळ्यास शुभत्वदर्शक अशा चिन्हाचे दर्शन झाले की मग त्याच्या इतर खोडी दृष्टियाडच होतात नाही का ? ४ ५८४ मजसवे नको चेष्टा । नव्हे साळी काहीं कोष्टा ॥ १ ॥ येस साडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ २ ॥ येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥ ३ ॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - दिमाख-श्रेष्ठपण, चार-वेडेचार अर्थ - देवा, माझ्याशी विनाकारण चेष्टामस्करी करू नकोस मी काही साळी, कोष्टी याच्या सारखा सामान्य नाही १ तू आपला श्रेष्ठपणा सोडून मजकडे ये मजवर कृपा कर आणि हे जर होत नसेल तर तू निघून जा कुठेही तोंड काळे कर २ येथे काही तुझे वेडेचार चालणार नाहीत वेडावाकडा व्यवहारही चालणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास सरस काय आहे नीरस काय आहे, हे जाणीत असतो ४ ५८५ भाव देवाचे उचित । भाव तोचि भगवंत ॥ १ ॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेस फंचा तेथें चित्तीं ॥ २ ॥ बहुत बराडी । देवजंवळी १ आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिक रिघो खडें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - संदेस-सदेह शंका, बराडी-आशा ठेवून असणे रोकडे-स्पष्ट अर्थ - भक्तिभावाने देवास शरण जाणे हेच योग्य आहे कारण भक्तिभाव हाच एक देव आहे १ ज्या जाती शुद्ध आहेत त्या धन्य होत कारण त्याच्या चित्तात संदेह कधीही नसतो २ ते देवादिययी फारच आशा ठेवून असतात, त्याची देवावर प्रीतीही मोठीच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात हे स्पष्ट आहे की, देवाचा लाभ अधिक प्रमाणात करून घेण्यास हेच भक्त समर्थ असतात ४ ५८६ गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे सकल्प ॥ १ ॥ कठिन योगाहूनि क्षेम । ओकलिया होतो श्रम ॥ २ ॥ पावले मरे शिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु आणी । कठिन निघालिया रणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - योगाहून-प्राप्तीपेक्षा, क्षेम-सांभाळ, आणी-बोलणे अर्थ - गौरवाचा प्रसंग हा गौरवापुरता ठीक आहे, पण सत्य सकल्पाचे फळ पाडुरंगाची कृपा हेच आहे १ कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीपेक्षा तिचा सांभाळ करणे कठिण काम आहे ती गोष्ट परत करण्याचा प्रसंग येतो तेव्हाही फार श्रम होतात २ घरातील त्रासास कंटाळून एखादा मनुष्य शिवेपाशी जातो व तेथे त्याला मरण येते म्हणजे घर सोडून शिवेपाशी येणे व तेथे मरणे, यातील श्रमच त्याच्या वाट्यास प्रामुख्याने दिसतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखादे बोलणे रूप शूरत्वाचे असले तरी, प्रत्यक्ष रणागणावर मात्र त्यास फार कठीण वाटते ४ ५८७ न राही अवगुण । यमें मानीतसे सिण ॥ १ ॥ भोग देतां करिती काई । फुडता यमदंडें दोई ॥ २ ॥ १ देवावरी