भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 332, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 332

२१८ सार्थ तुकारामगाथा मला नाजपर्यंत दुष्ट माणसाचीच संगत जडली होती. माझ्या हातून अनेक अन्यायकारक गोष्टी व अधर्माचे उपाय मी आजपर्यंत अनेक केले. आता माझे हित कशात आहे हेच मला समजेनासे झाले आहे. माझे अपराध मला आता आठवतही नाहीत, की ते वाचेने बोलूनही दाखविता येत नाहीत ५ असा मी आपला आपल्यासच घात करणारा झालो असून मी स्वतःचाच शत्रू व दावेदार बनलो आहे पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर आहेस ना ? मला या संसारसागरातून पार कर ना ६ विवरण :-या अभंगात व इतरही कित्येक ठिकाणी तुकारामबुवांनी मी पापी, मी दुराचारी असा उल्लेख केलेला आहे माझी बुद्धी मंद आहे, मी कधी तुझे ध्यान केले नाही, पुराणकीर्तन ऐकले नाही, संतांची सेवा केली नाही, काही तीर्थयात्रा केल्या नाहीत, असंगाचे संग घडले, हातून अधर्म फार झाले इत्यादी अनेक अपराधांची मालिका बुवांनी वरीलसारख्या अभंगातून गुंफिली आहे पुढील क्र ६७० च्या अभंगात तर देवा, मी चांडाळ आहे, मी अमंगल आहे, अवगुणाची खाण आहे, मला 'अखंड विषयांची व्यथा' असून मी 'अधम पुरता अधमाहूनी' आहे असे त्यांनी म्हटले आहे निंदा, द्वेष, विश्वासघात, काम, क्रोध, दंभ, अहंकार माझ्यामध्ये भरपूर असून माझे 'सदा परद्वारीं परधनीं ध्यान' असून मला 'दासीगमन' ही घडले आहे असे बुवा म्हणतात या सर्व वचनांचा काय अर्थ ? बुवांचे पूर्वायुष्य या दृष्टीने तपासून पाहावयास काही अभ्यासक तत्पर झालेले दिसतात तुकारामबुवां वारंवार म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच त्यांच्या आधीच्या आयुष्यात काही भलेबुरे आचार- विचार होते की काय ? या प्रश्नाचा विचार करताना असेच म्हणावेसे वाटते की, हे सर्व उद्गार भक्तीस अनुकूल होत जाणाऱ्या पवित्र वृत्तीच्या पार्श्वभूमीवरचे आहेत असतील नसतील तसल्या पापांचा उच्चार करून कबुळतीस यायचे, दीनता प्रकट करायची, करुणा भाकावयाची व ईश्वरास जवळ करायचे, ही एक पद्धती भक्तिमार्गातील ठरून गेल्यासारखी आहे तुकोबांच्या अभंगातील सर्व पापे त्यांना शाब्दिक अर्थाने चिकटविता येणार नाहीत 'मी तों अपराधाची राशी । शिखा अगूट कोंपशीं' यासारख्या उद्गारातील अतिशयोक्ती व अनुतापाची भूमिका याचा मेळ घालूनच याचा विचार व्हावयास हवा ऐन तारुण्यात, वयात असताना तुकोबांच्या हातून दुराचार वा पापकर्म या गोष्टी घडल्या असल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही अभंगातून अनेक प्रसंगी जो उच्चार होतो, तो केवळ भक्तीस अनुकूल होत राहणाऱ्या दीन व अनुतापयुक्त वृत्तीचाच निदर्शक मानणे युक्त होणार आहे नाही तर पुढे गाथेत क्र २८३५ चा अभंग 'माझिया मीपणावरी पडो पाषाण' या ओळीने सुरुवात होणारा वादग्रस्त अभंग आहे त्यातील सर्व दोष वाच्यार्थाने बुवांच्या अंगी लावण्याचे धैर्य कुणी करण्याचा प्रयत्न करील असे दिसत नाही कुणी तसा प्रयत्न केला तर तो टिकण्यासारखा नाही तुकोबा वृत्तीने सात्त्विक, पण धंदा वाण्याचा, सावकारकीचा या निमित्ताने काही निराळी व्यापारी नीती खरेखोटेपणाविषयी वापरावी लागली तरी, व्याकूळ होऊन जाणारे तुकोबा असल्या अभंगातील पातकांचे धनी स्वतः असतील हे संभवत नाही ऐन तारुण्यात माझ्या हातून पापे घडली, मी दुराचारी होतो, दुसऱ्यावर उपकार कधी केला नाही, संतांची निंदाच सतत केली, यासारख्या आत्मनिवेदनात अनुतापाची, न केलेल्या पातकांविषयी अनुतापाची वृत्तीच असणे शक्य आहे अंतःकरणातील प्रभू लौकर व्यक्त व्हावा, प्रकट व्हावा, प्रचीतीत यावा, यासाठी तुकोबांनी आपणा- पाठीमागे अनंत पातकांची नामावळी लावून घेतली ती शब्दशः सत्य मानून त्यांच्या चरित्रातील घटनांचे धागेदोरे हुडकणे व त्याचा अर्थ लावणे इष्ट व उचित नाही 'स्त्रियांचा तो संग नको नारायणा' यासारख्या वचनाने माहे झिडकारून टाकणाऱ्या तुकोबांच्या या अनुतापयुक्त उद्गाराचा अर्थ सावधपणे लावावयास हवा ६१४ आतां पावेन सकळ सुखें । सादलें फदा तें न देखें । अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियेरे ॥ १ ॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताचीच साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥ २ ॥