भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 362, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 362

विसावा मला मिळत नाही कुठल्याही एका गावात राहण्याचा माझा नेम नाही कुठे न फिरता एका जागी खिळून असावे हे माझ्या सत्तेत नाही देवा, खापरीत जशी लाही भाजत असताना तडफडते, तशी अवस्था माझ्या जीवाची झाली आहे ३ अशाच प्रकारचा काळ पुष्कळ गेला आणखी असा किती जाणार आहे, कुणास माहीत ? मरपाताची वेळ आली तरी, पुन पुन जन्मास मण्यास खट पडत नाही ४ असे माझे हे दुख देवा, कोण दूर करील ? कुणावर मी या ओझ्याचा भार घालू ? भवसिंधू तरून नेणारी नौका म्हणजे तुझे नाम आह कुणाचे काही काम अडवून राहिले शी तू धावून येतोस ५ नारायणा मग आता माझ्यासाठी एवढा धावून य ना मी दीन आहे गरीब आहे तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या अवगुणी माणसांस गुणही विचारू नका अशी करुणा मी देवा तुमच्याजवळ भाकीत आहे ६ ६५५ जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तव तू आपले स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुको नको ॥ १ ॥ जव काळ असे दुरी ठेला । तब तू हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरुनि भला । न वचे त्याला चुको नको ॥ २ ॥ जोडोनि धन न घलीं१ माती । ब्रह्मवृंद पूजन यती । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुको नको ॥ ३ ॥ दशा यौवन वाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगी । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहे सत्संगीं चुको नको ॥ ४ ॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें सचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - पांगिला-पंगू अप - जोपर्यंत हातपाय नीट धडधाकटपणे चालत आहेत, तोपर्यंत तू आपले स्वहित नीट पाहून राहा तीर्थयात्रांना जाण्यास चुकू नकोस १ जोपर्यंत यमाची पावले दूरच आहेत तोपर्यंत तू आपले स्वहित नीट साधून ठेव, नेहमी श्रीहरीचे गुण तू एश्वत जा मनात शुद्ध भाव धारण करून श्रीहरीच्या सेवेत कधी चुकू नकोम २ सारखा पैसाच पैसा जमवून मातीस घालयू नकोस ब्राह्मण यती सन्यासी यांची पूजा करण्यात त्या द्रव्याचा खर्च करावा नेहमी सत्याचे आचरण करावे सर्व भूतावर दयेची दृष्टी असावी या सर्वांचा ठेवा जवळ असावा यात तू कधी चुकू नकोस ३ जोपर्यंत अंगात तारुण्य आहे व विषयभोगांनी पंगुत्व आलेले नाही तोपर्यंतच काम, क्रोध, लोभ, मोह याथा त्याग करावा सतांच्या संगतीत राहण्यास कधी चुकू नका ४ आयुष्याची अरार एकदा आली की, मग काही उपाय चालणार नाही सत्ता, संपत्ती या गोष्टी जागच्या जागी राहतील व ज कर्म तुम्ही साठविले असेल ते साक्ष देत पुढ जाईल तुकाराम महाराज म्हणतात मग त्यावरून तुम्हास यमाची आज्ञा होईल ५ ६५६ ऐक पाडुरंगा एक मात । कांहीं बोलणे आहे एकांत । आम्हा जरी तारील सचित । तरी उचित काय तुझें ॥ १ ॥ उसने फेडिता धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वाया थोरपण जनामध्ये ॥ २ ॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगंतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमश्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥ ३ ॥ १ घाली