सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 451, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४१३ अबोलणे बोले डोळे झांकुनिया । बडबडी वाया दंभासाठीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणो खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देखोवेखी-दुसऱ्याचे पाहून अर्थ :- जे केवळ इंद्रियांच्याच ओढीमुळे त्याच्या आधीन झालेले असतात, त्यांना योग्य काय, अयोग्य काय, हे काहीसुद्धा समजत नाही आपल्या गुरुजवळ ते जे शिकले त्याची वृथा बडबड मात्र करीत असतात १ अशा वागण्याने हे लोकही नरकास जातातच, पण यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यातील पूर्वजही नरकास जातात २ हे लोक नुसते डोळे झाकतात व ब्रह्माचा अनुभव आला असल्याचे अबोल राहून बोलून दाखवितात. याची दांभिक बडबड मात्र व्यर्थ असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर तेथील चांगले परीक्षा करणारे असून जे दुसऱ्याचे पाहून ढोंग करून नाचतात, त्यांना आम्ही नीट जाणतो हे खरे आहे ४ ८९४ एक मन तुझ्या अवघ्या भाडवला । वाटिता ते तुला येई कैसें ॥ १ ॥ म्हणउनि दृढ धरीं पातुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ २ ॥ आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थित-स्थित अर्थ - तुला असणारे एक मन तू निरनिराळ्या व्यवहाराकडे कसे वाटून देणार आहेस ? १ यासाठी तू मनात पांडुरंग दृढ धरून राहा ना, व तुझा देह प्रारब्धाच्या संगतीत लाव ना. २ याखेरीज इतर कुठल्या संकल्पा- तून तू आपल्या मनास गुंतवू नकोस असे झाले तरच तुझे जीवितध्येय जे परमार्थसाधन ते साध्य होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जे उचित आहे ते तू जाणावेस असे तू जाणलेस तर तुला सहजास्थित अशी असणारी आत्मभावाची स्थिती समजून येईल ४ ८९५ गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥ १ ॥ हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ २ ॥ ऐकावी म्हण कथा । राहे तैसे धरूनि चित्ता ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धणी-तृप्ती अर्थ :- या श्रीहरीचे जे गीत असेल तेच गावे व त्या गाण्यातील रुपच मनात धरून असावे १ पण हे फारच अवघड काम असून, नुसते अन्न पाहून कधी भूक लागलेल्या माणसाची भूक भागेल काय ? २ म्हणून या श्रीहरीची कथा चित्तात राहील तशीच धरून ठेवावी लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरी तृप्ती पोटभर जेवण केल्याखेरीज होत नसते. ४ ८९६ कळेल हे खूण । तरि दावी नारायण ॥ १ ॥ सत्य संतापाशीं राहे । येरा भय आड आहे ॥ २ ॥ अणुचिया ऐसें । असे भरले प्रकाशें ॥ ३ ॥ इंद्रियाचे धनी । ते हे जाती समजूनि ॥ ४ ॥ तर्क फुटकें वाटा । नागवण घटापटा ॥ ५ ॥ तुका म्हणे ल्यावें । डोळा अंजन वरवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :-येरा-मत्नाशिवाय इतरांना, घटापटा-घटाकाश, पटाकाश अशी वेदान्तातील शुष्क चर्चा.