भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 486, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 486

४४४ सार्थ तुकारामगाथा पण विष्णुदासाच्या स्वभावाची जी दुसरी एक बाजू या अभंगात दर्शविलेली आहे, ती अधिक महत्त्वाची आहे किंबहुना ही दुसरी बाजू जेवढी भक्कम, तेवढी पहिलीची सुरक्षितता अधिक अस मानावे लागते साधुपुरुषाच्या रक्षणाची पहिली पायरी म्हणजे दुष्टांचा नाश, असा निर्वाळा गीतेनेच दिलेला आहे तुकाराम महाराजांनीही दयेची व्याख्या सांगताना 'दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचे' असेच आग्रहाने म्हटलेले बाहे दुष्ट लोकांचा नाश हाही एक दयेचाच भाग मानणे क्रमप्राप्त असते, आणि याच हेतूस ध्यानात धरून या अभंगात बुवा म्हणत आहेत, आम्ही कठिण अशा इंद्राच्या वज्रासही फोडून टाकू, नाठाळ माणसाच्या डोक्यावर आम्ही काठी हाणू, शत्रू सुद्धा करणार नाही अस घातपात आम्ही करू आमच्या पुढे बडू विषाची काय किंमत ? अशा भाषेतील अति शयोक्ती जरी सोडून दिली तरी मेणाहून मऊ असणाऱ्या विष्णुदासाच्या स्वभावातीलही कणखर बाजू ध्यानात येण्या- सारखी आहे याच वृत्तीस शोभणार असा आणखी एक अभंग 'पाया जाला नारु' (क्रमांक ४३७८) या ओळीन सुरू होणारा आहे त्यातील निष्कर्षही अर्थाभासी तो अधम' असाच आहे देव्हाऱ्यावर जर विंचू आला तर त्याची पूजा कशी करावी ? या प्रश्नाचे उत्तर देताना बुवानी म्हटले बाहे, 'तेथे पैजारेचे काम यावरून संताच्या भवाळ पणातील काठिण्य प्रसंगी किती प्रखर असते त ध्यानात येण्यासारखे आहे. ९८८ गाढवाचे ताने । पालटले क्षणक्षणे ॥ १ ॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ २ ॥ उपजता बरे दिसे । रूप वाढता ते नासे ॥ ३ ॥ तुका म्हणे भुकेले वेळे । वेळ अयेळ न कळे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - ताने-मूल पिल्लू, उपजता-जन्मास येताच अर्थ - गाढवाचे लहान पिल्लू किती मोजिरवाणे दिसते पण त्याची वाढ होत असताना मात्र त्याचे गुण क्षणाक्षणाला पालटलेले दिसतात ते अवगुणाकडे झुकते १ तशाच प्रकारे अधम माणसाचे गुण असतात त्याचे मन एकचित्ताने कुठेच स्थिर राहात नाही २ गाढवाचे पिल्लू जन्माला आल्यावर फार चांगले दिसते पण वय वाढल्यावर त्याचे रूप बिघडून जाते त्याचे अवगुण प्रकट होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे अवगुणी गाढव वेळी अवेळी उगाच भुकत असते अधम माणसाचेही असेच असते ४ ९८९ विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोवळा ॥ १ ॥ गद्य पद्य कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीनचि बुद्धि करुनी ठेवा ॥ २ ॥ विचाराचे काही करावे स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥ ३ ॥ तुका म्हणे न लगे जावे यमातरा । विश्व विश्वंभरा सारिखँचि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपाधी-अडचण अर्थ - दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री याचा विटाळ मानून जो तेथून दूर राहतो, तोच खरा सोवळा म्हणावा १ काही गद्य अथवा पद्य ग्रंथाचे पठण करून वृथा अडचण निर्माण न करिता आपली बुद्धी आपल्याच स्वाधीन करून ठेवावी २ परमार्थविचार करून काही स्वहित साधावे व पापपुण्याच्या पलीकडे असणाऱ्या आत्म- सुखाचे भांडवल प्राप्त करून घ्यावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुखासाठी रानावनात जाण्याची जरूरी नाही, कारण सबंध विश्वात भरून राहिलेला तो विश्वंभर व त्यापासून निर्माण झालेले हे चराचर विश्व, यात भेद नाही तोच सर्वत्र सामावून राहिलेला आहे ४ ९९० कल्पतरु रया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया १ ॥ १ ॥ उडड त्या गाई म्हंसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥ २ ॥ तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवे भेटी थोर पुण्य ॥ ३ ॥ १ इच्छी तया