सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 487, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४४५ शब्दार्थ व टीपा :- रया-रुईची झाडे, कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणाऱ्या गाई अर्थ :- रुईची झाडे, बाभळींची झाडे हे काही कल्पतरु नव्हेत. त्यांच्यापासून इच्छिलेले फळ कधी प्राप्त होणार नाही. १ सर्वसामान्य अशा गाई, म्हशी व शेळ्या पुष्कळच आहेत. परंतु मनात इच्छिलेली वस्तू देणाऱ्या कामधेनू मात्र यांच्याहून वेगळ्याच आहेत. २ तुकाराम महाराज म्हणतात, देव आपणांस ज्या ज्या गोष्टी दाखवील त्यांची भेट डोळघांनी घेणे, यातच फार मोठे पुण्य आहे असे समजावे. ३ ९९१ जळो प्रेमा तैसा रंग । जाय उडोनि' पतंग ॥ १ ॥ सासूसार्टी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥ मंद मुखाँचा फोवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥ जैसीं वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥ बक ध्यान धरी । सोंग करुनि² मासे मारी ॥ ५ ॥ तुका म्हणे सर्प डोले । तैसा कयेमाजी खुले ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- पतंग-फुलपाखराची एक जात, मंद-लबाड, कपटी, वृंदावनकांती-कडू वृंदावनाचे फळ, बक-बगळा. अर्थ :- फुलपाखरांच्या एका जातीस, पतंगास दिव्याविषयी मोठेच प्रेम असते. या प्रेमापोटी तो दिव्यावर झडप घालून जळून जातो. अशा प्रेमाच्या रंगास आग लागो. १ सासू मरण पावली म्हणजे सून रडत असते, पण तिच्या अंतरंगातील भाव मात्र निराळाच असतो. २ कपटी मनुष्य हा चेहऱ्यावरून फार चांगला दिसतो, कोमलतेने बोलतो, पण त्याच्या मनातील भाव मात्र निराळाच असतो. ३ कडू वृंदावनाच्या फळाची वरवरची कांती किती शोभिवंत असते. पण आतून ते कडूच असल्यामुळे हातातही धरू नये ते. ४ बगळा नदीच्या काठी डोळे मिटून ध्यान केल्यासारखा उभा राहतो; पण ते सर्व सोंग असते. संधी सापडताच मासे पकडण्यासाठी तो टपलेला असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, गारुड्याच्या पुंगीच्या नादाने सर्प जसा डोलतो, तसाच हा वरवर भाविकपणा दाखविणारा मनुष्य कथेमध्ये डुलत असतो; पण त्याचे हे करणे खरे नसते. ६ ९९२ वेशा नाहीं बोल अवगुण दूपीले । ऐशा बोला भले ह्मणें क्षोभा ॥ १ ॥ कोण नेणे अन्न जीयाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ २ ॥ सोने शुध्द नेणे कोण हा विचार । डांकें हीनयर केलें त्यासी ॥ ३ ॥ याती शुध्द परि अधम लक्षण । वायां गेलें तेणें सोंगें ही तें ॥ ४ ॥ तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार याहो ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेशा-वेषास, पोषाखास, ह्मणे क्षोभा-राग मानू नका, डांके-सराफानी, सोनारांनी, हीनवर-हिणकस, मंडण-वरवरची शोभा. अर्थ :- साधू लोकांनी घेतलेल्या वेषास मी बोल देत नसून त्यांच्या अंगच्या अवगुणांना मात्र दोष देत आहे. माझ्या या बोलण्यामुळे भल्या माणसांनो, तुम्ही रागावू नये. १ सर्व वस्तुमात्रांचे व प्राण्यांचे जीवन अन्न हेच आहे, असे कोण जाणीत नाही? पण त्यात विष कालविले गेले असेल तर सर्वच अन्न विषमय होऊन सर्वांनाच घातककारक होईल ना. २ सोने हे शुद्ध व चांगलेच असते, असे कोण जाणीत नाही? पण सोनारानी मात्र त्यात हीन धातूंचे मिश्रण करून ते हीन केलेले असते. ३ एखाद्याची जात जरी शुद्ध असली, तरी तो अधमाच्या लक्षणांनी वायाच गेल्यासारखी असते. शुद्धत्वाचेही सोंग मग वायाच जाते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूचा नाश करून विजय संपादन करणारा तोच शूर होय. तोच मानसन्मानास योग्य होय. पण इतरांनी अंगावर सैनिकाची वस्त्रे पांघरून शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला तरी, ते केवळ ओझेच आहे असे मानणे भाग आहे. ५ १ भुलोनि, २ धरूनि.