भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 488, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 488

४४६ सार्थ तुकारामगाथा १९३ अणुरणीया' थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥ गिळुनि सांडिले कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ २ ॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । उरलों उपकारापुरता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अणुरणीया-अणुरेणूपेक्षाही, थोकडा-सूक्ष्म, त्रिपुटी-ज्ञेय ज्ञाता, ज्ञान इत्यादी तिहीचा समुदाय अर्थ - मी तुकाराम तसे पाहिले तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशाएवढा विस्तारलेलो आहे १ मी देहादी व प्रपंचादिकाचा अभिमान गिळून शरीर सोडून दिल्यासारखेच आहे प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी सोडलेला आहे २ ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशासारख्यांची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये प्रज्वलित केला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठींच उरलेलो आहे ४ विवरण - या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल असे आहोत, याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले आहे एवच सूक्ष्म तत्त्व सर्व जगतात भरून राहिलेले आहे, याचा सुंदर अविष्कार जो 'अणोरणीयान्महतो महीयान' या कठोपनिषदातील सूत्रात झालेला आहे, त्याचा अनुवाद तुकोबांनी सहजमहनी या अभंगात मार्मिकपणे केलेला आहे 'अणु अणोरणीया आगळें' या शब्दांनी मागेही अभंग क्र ४५१ मध्ये बुवानी असेच वर्णन केलेले आपण पाहिले आहे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या तत्त्वाचाच सर्व विश्वात भरून राहिलेला अविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरे काहीच नाही याची जाणीव श्रेष्ठ साधकास नेहमीच होत असते जळीस्थळी ईश्वरतत्त्व पाहाणे व एकाच आत्मतत्त्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफिली गेली आहे, असे अनुभवास येणे, हाच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म होय तुकोबांना ही अनुभूती तीव्रतेने आलेली होती 'आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें', 'नभोमय जाले जळ । एकीं सकळ हरपले', 'तुका म्हणे कल्प झाला । अस्त गेला उदयो', 'काहींच मी नव्हे कोणिये गांवींचा । एकटा ठांयींच्या ठायीं एक', 'आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्यें वास' इत्यादी वचनातून तुकारावाच्या अनुभूतीची विशालता ध्यानात येण्यासारखी आहे अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ? याही प्रश्नाचे उत्तर तुकारामबुवांनी या अभंगात दिले आहे इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे स्वतःस साक्षात्कार झाल्यावर 'आपण जेऊन जेववी लोकां । सतर्पण करो तुका' अशी भूमिका तुकोबांसारख्या सत्पुरुषांना घ्यावी लागते लोकांनी सन्मार्गावर राहावे, केवळ प्रपंच व पैसापैगा न करिता ईश्वराची आठवण ठेवावी, अनाचारात व व्यसनात रमू नये, दुष्टाच्या संगतीत राहू नये, म्हणून साधुसंतांच्या एकसारख्या उपदेशाची फार मोठी जरूरी असते 'उपदेशी तुका । मेघवृष्टीने जाइरा' असा निर्वाळा दुसऱ्या एका अभंगात त्यांनी दिलेला आहे मेघाचा स्वभावच सहज वृष्टीचा असून त्याचा फायदा ज्याचा त्यान घ्यावयाचा असतो १९४ धन्य आजि दिन । जाले संताचे दर्शन ॥ १ ॥ झाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥ २ ॥ झाले समाधान । पायीं विसावले मन ॥ ३ ॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दिन-दिवस, तुटी-नाश, उठाउठी-ताबडतोब, त्वरित १ अणुरेणुया

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 488, कुल 611 में से · BharatKosha