भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 494, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 494

४५२ सार्थ तुकारामगाथा सल्ला कृपावंत याचा त्याची', ' शिकविता धनी वेगळाचि', ' परि त्या विश्वभरें बोलवितें', ' तुका म्हणे मज बोल- वितो देव', ' वदें साक्षत्देशीं वाणी । नारायणीं मिश्रित ' अशा अनेक वचनांतून तुकोबांनी आपली वाणी ही आपली नसून प्रत्यक्ष विठ्ठलाची, विश्वंभराची आहे असे पुनःपुनः सांगितले आहे म्हणूनच तुकोबांच्या वाणीचे व कवित्वाचे तंग दिव्य, अलौकिक व जिव्हाळभाये असे आहे कवित्वाचे शब्द हे काही टांकसाळींतील नाणे नव्हे, असेही त्यांनी एका अभंगात म्हटल आहे केवळ देवानेच प्रेरणा दिली म्हणूनच आपली वाणी एवढी दिव्य व रसाळ झाली, असा ययाचा अभिप्राय आहे याच अभंगात त्यांनी या तीर्थाचे वर्णन करताना म्हटल आहे ' तुका म्हणे देवें केला बलात्कार ' सारांश, आपण पामर आहोत साध्या साध्या शब्दांचेही अय आपणास समजणारे नाहीत, पण तो गोविंद बदविणारा असल्यामुळे आपल्याकडून हा कवित्वाचा प्रकार होतो आपण खरे म्हणजे ईश्वराचे केवळ एकनिष्ठ सेवक आहोत, व त्याच्या नामाची मुद्रा आपल्या कृतीवर असल्याने ती प्रासादिक व प्रसादपूर्ण झाली आहे या अभगांतील 'मुद्रा नामाची' यावरी इत्येही ध्यानात घेण्यासारखा आहे तुकोबांना कवित्वाच देणे नामदेवाच्या परंपरेपासून लाभलेले आहे नामदेवांनी त्यांना अभंगरचनेची स्फूर्ती दिली अशी त्याचीच साक्ष आहे 'मुद्रा नामाची' म्हणजे नामदेवरायाची मान्यता असाही अर्थ शोधून दिसणारा आहे १००८ आम्हो गावे तुम्ही कोणीं कांहीं न म्हणावे । ऐसे तब आम्हा सागितले नाहीं देवे ॥ १ ॥ म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ २ ॥ सहज घडे तया आळस करणे ते काई । अग्नीचे भातुके हात पाळितां' कां पायीं ॥ ३ ॥ येथे नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हासे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥ ४ ॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥ ५ ॥ सदैव ज्या कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥ ६ ॥ शब्दार्थ य टीपा - भातुके-साद्य, साळविताळ-ताल, बेताल येर-दुसरे अर्थ - आम्ही मात्र देवाचे नाम घ्यावे व तुम्ही मान कुणी काहीही म्हणू नये, हा प्रकार काही आम्हास आमच्या देवानी सांगितलेला नाही १ यासाठी तुम्ही मुखाने रामराम म्हणावे, हातानी टाळी वाजवावी आणि स्वहितासाठी प्रेमाने प्रभूसाठी नाचा, डोलत राहा २ प्रभुमाप्ती जो अशी सहज होणारी आहे, तिच्याविषयी आळस काय कामाचा ? आपल्या हातापायाना जपून का ठविता ? शेवटी त्याचे भाग्य अग्नीसच होणार आहे ना ? मग त्याचा उपयोग आधीच हरिभजनाकडे का नाही करीत ? ३ भक्तिभावाच्या ठिकाणी लाज कसली आली आहे? लौकिकाची पर्वा तरी कशास हवी ? या ठिकाणी जो कुणी हसेल, त्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल ४ ज्याचा जसा भाव असेल, तसे त्याने भक्तींचे प्रतिपादन करावे या ठिकाणी देवास भजनातील तालाची किंवा बेतालाची पर्वा मुळीच नसते ५ हरिकथेच्या वेळेस ज्याला श्रवण घडते, तो सुदैवीच म्हणावयास हवा तुकाराम महाराज म्हणतात, 'हरिभजन न करणारे दुसरे जे कुणी लोक असतील ते मनुष्याच्या जन्माला येऊन दगडच आहेत असे समजावे ६ १००९ देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥ १ ॥ देव न लगे देव न लगे । साटवणेचे रघले जाये ॥ २ ॥ देव मदला देव मदला । भाव बुडाला काय करू ॥ ३ ॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥ ४ ॥ दुबळा तुका भावेविणे । उधारा देव घेतला गुणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - रघले-अडून गेले, फुका-फुकट, रुका-पैसा १ पोळिता